शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

 सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या ‘यलो’ यादीतील शेतकरी ‘रेड’मध्ये, कर्जमाफीसाठी पात्र झाले ३,२२४ शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:29 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांची कर्जमाफीअपात्र ठरलेल्यांमध्ये बार्शीचे २ हजार ७३, सांगोल्याचे १ हजार ९२७, मोहोळचे १ हजार ६४४, करमाळ्याचे ७०२, माढ्याचे ३४०, दक्षिणचे १२७, माळशिरसचे ८०, उत्तरचे १६ व मंगळवेढ्याच्या ४ शेतकºयांचा समावेश जिल्हा बँकेला आलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ९५ हजार १७९ शेतकºयांपैकी तपासणीत ६६ हजार ८०९ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांची कर्जमाफी होत आहे. सोलापूर जिल्हा बँकेला ११ हजार १४० शेतकºयांची ‘यलो’ यादी आली होती. ती बँकेने तपासणीसाठी विकास सोसायट्यांकडे दिली होती. सोसायट्यांचे सचिव, बँकेच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत ३२२४ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले आहेत. ही पात्र शेतकºयांची यादी शासनाला आॅनलाईन पाठवली असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. तपासणीत निकषात न बसणारे ६ हजार ९१६ शेतकरी निघाले आहेत. शासनाने निकष लावल्याने या अपात्र शेतकºयांची नावे कर्जमाफीतून कायमची बाहेर पडली आहेत. शासनाने दिलेल्या निकषानुसार ‘यलो’ यादी तपासणीनंतर हे शेतकरी ‘रेड’ यादीत आले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ९५ हजार १७९ शेतकºयांपैकी तपासणीत ६६ हजार ८०९ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले असून त्रुटी निघालेल्या २८ हजार ३७० शेतकºयांची अचूक यादी शासनाला फेरसादर केली आहे. याशिवाय ४७ हजार ११ शेतकºयांची ‘मिसमॅच’यादी तपासणीसाठी गावपातळीवर पाठवली असून यावर तालुका समिती निर्णय घेणार आहे. -------------------अक्कलकोटचे सर्व शेतकरी पात्र - जिल्हा मध्यवर्ती बँकेला आलेल्या १० हजार १४० शेतकºयांच्या यादीच्या तपासणीत माढ्याचे ९४७, पंढरपूरचे ५४५, सांगोल्याचे ३२९, करमाळ्याचे ३२०, मोहोळचे २९८, माळशिरसचे २२०, अक्कलकोटचे २१७, दक्षिणचे १८५, मंगळवेढ्याचे ७२, बार्शीचे ३८ व उत्तर तालुक्यातील ५६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. - अपात्र ठरलेल्यांमध्ये बार्शीचे २ हजार ७३, सांगोल्याचे १ हजार ९२७, मोहोळचे १ हजार ६४४, करमाळ्याचे ७०२, माढ्याचे ३४०, दक्षिणचे १२७, माळशिरसचे ८०, उत्तरचे १६ व मंगळवेढ्याच्या ४ शेतकºयांचा समावेश आहे. अक्कलकोटचा एकही शेतकरी अपात्र ठरला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी