शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शेतकºयांची दिवाळी अंधारातच; पंचनामे पूर्ण व्हायला आणखी दहा दिवस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:10 IST

सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती : अद्याप १० टक्केच पंचनामे पूर्ण

ठळक मुद्देवेधशाळेने पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहेनदीपात्राशेजारील सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला स्थलांतरित बहुतांश नागरिकांना अद्याप निवारा केंद्र न सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे

सोलापूर : अतिवृष्टीमुळे शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरलंय. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुराचे पाणी आता हळूहळू ओसरते आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त दहा टक्केच पंचनामे झाले आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

कृषी सहायक, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्या संयुक्त पथकाद्वारे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सुरुवातीला बहुतांश गावांमध्ये पुराचे पाणी तीन ते पाच फुटांपर्यंत असल्याने पंचनामे करताना अनेक अडथळे आलेत. मागील दोन दिवसात पुराचे पाणी ओसरते आहे. त्यामुळे पंचनामे करायला सुरुवात झाली असून यात शेती पिकांचे नुकसान, मृत्युमुखी पडलेले जनावरे, घरांची पडझड, स्थलांतरित नागरिक यांसह इतर अनेक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आली.

अतिवृष्टीमुळे जवळपास साडेआठशेहून अधिक कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागले. बत्तीस हजारांहून अधिक नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना, खासगी इमारती तसेच मठांमध्ये आश्रय घ्यावा लागला. २२०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, साडेआठ हजार मोठी आणि छोटी जनावरे दगावली आहेत. सोळा लोक मृत्युमुखी पडले आहेत. जवळपास दीड लाख खरीप पीक क्षेत्र यातून बाधित झाले आहे, अशी नुकसानीची माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली आहे.

जिल्हा प्रशासन अद्यापही सतर्कवेधशाळेने पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीपात्राशेजारील सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. स्थलांतरित बहुतांश नागरिकांना अद्याप निवारा केंद्र न सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात झाल्यास नदीशेजारील सर्व नागरिकांना तत्काळ स्थलांतरित होण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफच्या दहा पथकांना तालुक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसagricultureशेतीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय