शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 10:58 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लकसध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र

अरुण बारसकर आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लक असल्याचे कारण पुढे करून शासन जमा करून घेतले आहेत. सध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकºयांसाठीही बँकांना पैसे दिले जात नाहीत. २९ जानेवारीपर्यंत राज्यात एकूण ३० लाख ८६ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. शासनाने आतापर्यंत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा केली असून त्यातील त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या त्रुटी दूर करुन अचूक याद्याही शासनाकडे बँकांनी दिल्या आहेत. मात्र बँकांकडे पैसे नसल्याने पात्र असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करता येत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान घाईने जिल्हा बँका तसेच राष्टÑीय बँकांना १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांची यादी दिली होती. प्रत्यक्षात आवश्यक रक्कम दिली नाही. त्यामुळे पात्र शेतकºयांची यादी असूनही तसेच दीड लाखावरील रक्कम जमा केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ---------------अचूक याद्याही लटकल्या - राज्यातील ३४ जिल्हा बँका तसेच राष्टÑीयीकृत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची आवश्यकता आहे. ---------------------‘ग्रीन’ यादी तपासणीनंतर पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व दीड लाखावरील रक्कम कर्ज खात्यावर भरणाºया शेतकºयांचा समावेश आहे.- ग्रीन यादीतील त्रुटी निघालेल्या शेतकºयांच्या याद्या अचूक करुन त्या शासनाकडे पाठविल्या आहेत. या यादीतील शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसेही देत नाही व ही पात्र यादी बँकांनाही देत नाही. - राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी (५६ लाख ५९ हजार कुटुंबांनी) कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले. - अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र झाले आहेत. --------------------------सोलापूर जिल्हा बँकेने ‘ग्रीन’ यादी तपासणी करुन १८ हजार ३७० पात्र शेतकºयांची तसेच ‘यलो’ यादीच्या तपासणीत पात्र झालेल्या ३२२४ शेतकºयांची पात्र यादी शासनाला पाठवली आहे. बँकेकडे कर्जमाफीचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी तीही रक्कम परवानगी नसल्याने जमा करता येत नाहीत. - राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी