शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 10:58 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लकसध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र

अरुण बारसकर आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लक असल्याचे कारण पुढे करून शासन जमा करून घेतले आहेत. सध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकºयांसाठीही बँकांना पैसे दिले जात नाहीत. २९ जानेवारीपर्यंत राज्यात एकूण ३० लाख ८६ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. शासनाने आतापर्यंत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा केली असून त्यातील त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या त्रुटी दूर करुन अचूक याद्याही शासनाकडे बँकांनी दिल्या आहेत. मात्र बँकांकडे पैसे नसल्याने पात्र असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करता येत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान घाईने जिल्हा बँका तसेच राष्टÑीय बँकांना १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांची यादी दिली होती. प्रत्यक्षात आवश्यक रक्कम दिली नाही. त्यामुळे पात्र शेतकºयांची यादी असूनही तसेच दीड लाखावरील रक्कम जमा केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ---------------अचूक याद्याही लटकल्या - राज्यातील ३४ जिल्हा बँका तसेच राष्टÑीयीकृत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची आवश्यकता आहे. ---------------------‘ग्रीन’ यादी तपासणीनंतर पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व दीड लाखावरील रक्कम कर्ज खात्यावर भरणाºया शेतकºयांचा समावेश आहे.- ग्रीन यादीतील त्रुटी निघालेल्या शेतकºयांच्या याद्या अचूक करुन त्या शासनाकडे पाठविल्या आहेत. या यादीतील शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसेही देत नाही व ही पात्र यादी बँकांनाही देत नाही. - राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी (५६ लाख ५९ हजार कुटुंबांनी) कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले. - अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र झाले आहेत. --------------------------सोलापूर जिल्हा बँकेने ‘ग्रीन’ यादी तपासणी करुन १८ हजार ३७० पात्र शेतकºयांची तसेच ‘यलो’ यादीच्या तपासणीत पात्र झालेल्या ३२२४ शेतकºयांची पात्र यादी शासनाला पाठवली आहे. बँकेकडे कर्जमाफीचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी तीही रक्कम परवानगी नसल्याने जमा करता येत नाहीत. - राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी