शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 10:58 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लकसध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र

अरुण बारसकर आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लक असल्याचे कारण पुढे करून शासन जमा करून घेतले आहेत. सध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकºयांसाठीही बँकांना पैसे दिले जात नाहीत. २९ जानेवारीपर्यंत राज्यात एकूण ३० लाख ८६ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. शासनाने आतापर्यंत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा केली असून त्यातील त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या त्रुटी दूर करुन अचूक याद्याही शासनाकडे बँकांनी दिल्या आहेत. मात्र बँकांकडे पैसे नसल्याने पात्र असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करता येत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान घाईने जिल्हा बँका तसेच राष्टÑीय बँकांना १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांची यादी दिली होती. प्रत्यक्षात आवश्यक रक्कम दिली नाही. त्यामुळे पात्र शेतकºयांची यादी असूनही तसेच दीड लाखावरील रक्कम जमा केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ---------------अचूक याद्याही लटकल्या - राज्यातील ३४ जिल्हा बँका तसेच राष्टÑीयीकृत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची आवश्यकता आहे. ---------------------‘ग्रीन’ यादी तपासणीनंतर पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व दीड लाखावरील रक्कम कर्ज खात्यावर भरणाºया शेतकºयांचा समावेश आहे.- ग्रीन यादीतील त्रुटी निघालेल्या शेतकºयांच्या याद्या अचूक करुन त्या शासनाकडे पाठविल्या आहेत. या यादीतील शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसेही देत नाही व ही पात्र यादी बँकांनाही देत नाही. - राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी (५६ लाख ५९ हजार कुटुंबांनी) कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले. - अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र झाले आहेत. --------------------------सोलापूर जिल्हा बँकेने ‘ग्रीन’ यादी तपासणी करुन १८ हजार ३७० पात्र शेतकºयांची तसेच ‘यलो’ यादीच्या तपासणीत पात्र झालेल्या ३२२४ शेतकºयांची पात्र यादी शासनाला पाठवली आहे. बँकेकडे कर्जमाफीचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी तीही रक्कम परवानगी नसल्याने जमा करता येत नाहीत. - राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी