शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शेतकऱ्यांनो सावधान; बियाणे, कीटकनाशक बोगस अन्  खतांमध्ये येतेय मीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 16:37 IST

कृषी विभागाचे लक्ष: बोगस बियाणे, कीटकनाशकची होतेय बाजारात विक्री

सोलापूर : शेतकऱ्यांनो पीक चांगले येण्यासाठी तुम्ही बियाणे, कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर करीत असाल तर सावधान. या सर्व गोष्टी प्रमाणित असल्याची खातरजमा करा, अन्यथा बोगस उत्पादन माथी मारून विक्रेतेच मालामाल होत असल्याचे कृषी खात्याच्या कारवाईवरून दिसून आले आहे.

शेतीमध्ये विक्रमी पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आता शेतकरी बंधूमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी बाजारात मिळणारे बियाणे, रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे, खते व कीटकनाशके बाजारात आणणारे एजंट सक्रिय झाल्याचे गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायावरून दिसून आले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनेक कंपन्या बंद होत्या. याचा फायदा घेत कोल्हापुरातील एजंटांनी तामिळनाडूतील बोगस खत बाजारात आणल्याचे उघडकीला आले होते. टेंभुर्णी व मोहोळ येथे झालेल्या कारवाईत ही बाब उघड झाली होती.

तसेच खरिपाच्या पेरणीवेळेस सोयाबीनच्या बियाणाला मागणी वाढली होती. या काळात बोगस बियाणांचा पुरवठा झाला. बार्शीत तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण झाली नसल्याची तक्रार आल्यावर कृषी विभागाने तपासणी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. गहू, हरभरा बियाणाची खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

चार गुन्हे दाखल

गेल्या वर्षभरात अप्रमाणित खते व बियाणे विक्रीस आणणाऱ्या ४५ जणांना नोटिसा देण्यात आल्या तर ४ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. बियाणे अप्रमाणित पुरविणाऱ्या १३ कंपन्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर दोघांचा बियाणे परवाना निलंबित करण्यात आला आहे.

द्रवरूप खताबाबत सावधान

कृषी विभागाने खरीप व रब्बी हंगामावेळेस कृषी उत्पादन विक्रेते दुकानदारांची तपासणी मोहीम राबविली. यात सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या कीटकनाशकाला मागणी जास्त असते. विनापरवाना उत्पादित केलेले कीटकनाशक बाजारात येत आहे. त्याचबरोबर अलीकडे द्रवरूप खते बाजारात येत आहेत. असे ८० हजार किमतीचे १५० लिटर द्रवरूप खत कृषी विभागाने जप्त केले व संबंधितावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या वर्षभरात करण्यात आलेली कारवाई

  • प्रकार             बियाणे             खते             कीटकनाशके
  • किती नमुने तपासले ७१२             ३९६             ३२५
  • अप्रमाणित नमुने १७             ४५             ८
  • नोटीस दिली             १७             ४५             ८
  • कोर्टात केसेस दाखल ३             २५             ७
  • विक्री बंदचे आदेश ०             ०             ०
  • जप्तीची संख्या-परवाने रद्द ०             १             ०

शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेताना खातरजमा करावी. अलीकडे द्रवरूप खताचा वापर वाढला आहे. यासाठी मोठी किमत शेतकऱ्यांना मोजावी लागते. सेंद्रीय आहे, कंपनीचे आहे असे सांगून एजंट लोक बोगस माल पुरवितात. यात शेतकऱ्यांची फसवणूक होते. बाजारात येणाऱ्या अशा गोष्टींवर शेतकऱ्यांची करडी नजर आहे.

सागर बारवकर, गुण नियंत्रण अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी