शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:54 IST

विष प्राशन केलेले सुनील कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

अक्कलकोट - ऊसाचे बिल मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. २ ऑगस्टला दुपारी ४ वाजता शेतातील वस्तीवर त्याने औषध प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी ११ ऑगस्टला सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. सुनील कुंभार असं २८ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

माहितीनुसार, सुनील कुंभार यांनी दक्षिण सोलापूरातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याला मागील वर्षी ऊस पाठवला होता. त्याचे अद्याप बिल मिळालेले नाही. ऊस जाऊन नऊ महिने झाले तरी पैसे मिळाले नाहीत. पैशांची मागणी करूनही बिल मिळत नसल्याने २ ऑगस्टला नैराश्य येऊन त्यांनी शेतातील वस्तीवर विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ८ दिवसांनी ११ ऑगस्टला सुनीलचा मृत्यू झाला. 

सुनील यांच्या खिशात सापडली चिठ्ठी

विष प्राशन केलेले सुनील कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनाचे काम सुरू होते. सुनील यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. सुनील यांच्या भावाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात वडील, आई आहेत. सुनील अविवाहित होता, दोन बहिणी असून त्यांचे लग्न झाले आहे.

दरम्यान, मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझा ऊस गोकुळ कारखान्याला गेला होता. त्याचे दीड लाखापर्यंत बिल आहे. वारंवार मागणी करूनही कारखान्याने बिल दिले नाही. बँक ऑफ महाराष्ट्र मैदर्गी येथून कर्ज घेतले आहे. बँक अधिकारी पैसे भरण्यासाठी तगादा लावत होते. एकीकडे कारखान्याकडून ऊसाचे बिल मिळत नव्हते, दुसरीकडे बँकेकडून कर्जाची रक्कम भरण्यासाठी तगादा सुरू होता. या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात या सर्व बाबींची नोंद आहे असं मयत सुनीलचे वडील चौडप्पा कुंभार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी