शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली मागेल त्याला शेततळे योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 12:52 IST

सामुदायिक शेततळ्याची योजना नावालाच

सोलापूर : मागेल त्याला शेततळ्याची योजना राज्य शासनाने ''क्लोज'' केली, तर निवड झालेल्या १९ सामूहिक शेततळ्यांपैकी तब्बल ११ रद्द केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदानावर शेततळी खोदणे कठीण होणार आहे.

तत्कालीन भाजपा - शिवसेना युती सरकारची मागेल त्याला शेततळ्याची योजना प्रभावी व लोकप्रिय ठरली होती. शेतकरी ऑनलाईनद्वारे शेततळ्यासाठी अर्ज करीत होते. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ''मागेल त्याला शेततळे'' योजनेकडे दुर्लक्ष सुरू केले. राज्यात सत्तेवर आल्यानंतर शेततळ्याला नव्याने मंजुरी देणे बंद केले व अनुदानही टप्प्या-टप्प्याने व विलंबाने येऊ लागले. त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजनेला घरघर लागणार, हे नक्की होते अन् तसेच झाले. आता ही मागेल त्याला शेततळ्याची योजना बंद करण्यात आली आहे.

पूर्वीपासूनच सुरू असलेली सामूहिक शेततळ्याची योजना सुरू असली तरी, ती नावालाच सुरू आहे. मागील वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात १९ सामूहिक शेततळ्यांना मंजुरी दिली होती. त्यापैकी ११ शेततळ्यांची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. एक तळे पूर्ण झाले आहे, तर ७ तळ्यांचे काम प्रोसेसमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

''एक वर्ष एक तळे''

सोलापूर जिल्ह्यात बागायतीसोबत फळबागांचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे. फळबागा अन् शेततळे हे सूत्रच ठरले आहे. मात्र मागील वर्षभरात जिल्ह्यात एकच सामूहिक शेततळे झाले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचे प्रस्ताव असले तरी, शासनाने मंजुरीअगोदरच योजना बंद केली आहे. खोदाई, अस्तरीकरण व संरक्षण तारेच्या सामूहिक शेततळ्यांसाठी २४ × २४ × ४ मीटर - एक लाख ७५ हजार, ३० × ३० × ४.७ मीटर - दोन लाख ४८ हजार, ३४ × ३४ × ४.४ मीटर - ३ लाख ३९ हजार.

चौकट

अशी झाली मागेल त्याला शेततळी...

  • *उत्तर तालुका- ५७०
  • * दक्षिण तालुका- ७२१
  • * मोहोळ तालुका - १२१५
  • * अक्कलकोट - ६९४
  • * बार्शी तालुका - ८७६
  • * माढा तालुका - १८१०
  • * करमाळा - ५३५
  • * पंढरपूर - १९८५
  • * सांगोला - १९७९
  • * मंगळवेढा - १०३५
  • * माळशिरस - ९९४
  • एकूण - १२, ४३२

* जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे ४७ हजार २५ अर्ज आले होते. त्यापैकी २२ हजार ५८२ शेततळ्यांना मंजुरी दिली होती. १२,४३२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली, तर योजना बंद होताना ३४५५५ शेततळी रद्द करण्यात आली.

 

मागील वर्षभरात दोन वेळा मागेल त्याला शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. मंजूर किंवा नामंजूर काहीच समजले नाही. मागील तीन वर्षांपासून चांगला पाऊस आहे, परंतु गरज म्हणून शेततळ्याचे काम करायचे आहे.

- निशिकांत देशमुख, अर्जदार शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी