शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली मागेल त्याला शेततळे योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 12:52 IST

सामुदायिक शेततळ्याची योजना नावालाच

सोलापूर : मागेल त्याला शेततळ्याची योजना राज्य शासनाने ''क्लोज'' केली, तर निवड झालेल्या १९ सामूहिक शेततळ्यांपैकी तब्बल ११ रद्द केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदानावर शेततळी खोदणे कठीण होणार आहे.

तत्कालीन भाजपा - शिवसेना युती सरकारची मागेल त्याला शेततळ्याची योजना प्रभावी व लोकप्रिय ठरली होती. शेतकरी ऑनलाईनद्वारे शेततळ्यासाठी अर्ज करीत होते. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ''मागेल त्याला शेततळे'' योजनेकडे दुर्लक्ष सुरू केले. राज्यात सत्तेवर आल्यानंतर शेततळ्याला नव्याने मंजुरी देणे बंद केले व अनुदानही टप्प्या-टप्प्याने व विलंबाने येऊ लागले. त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजनेला घरघर लागणार, हे नक्की होते अन् तसेच झाले. आता ही मागेल त्याला शेततळ्याची योजना बंद करण्यात आली आहे.

पूर्वीपासूनच सुरू असलेली सामूहिक शेततळ्याची योजना सुरू असली तरी, ती नावालाच सुरू आहे. मागील वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात १९ सामूहिक शेततळ्यांना मंजुरी दिली होती. त्यापैकी ११ शेततळ्यांची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. एक तळे पूर्ण झाले आहे, तर ७ तळ्यांचे काम प्रोसेसमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

''एक वर्ष एक तळे''

सोलापूर जिल्ह्यात बागायतीसोबत फळबागांचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे. फळबागा अन् शेततळे हे सूत्रच ठरले आहे. मात्र मागील वर्षभरात जिल्ह्यात एकच सामूहिक शेततळे झाले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचे प्रस्ताव असले तरी, शासनाने मंजुरीअगोदरच योजना बंद केली आहे. खोदाई, अस्तरीकरण व संरक्षण तारेच्या सामूहिक शेततळ्यांसाठी २४ × २४ × ४ मीटर - एक लाख ७५ हजार, ३० × ३० × ४.७ मीटर - दोन लाख ४८ हजार, ३४ × ३४ × ४.४ मीटर - ३ लाख ३९ हजार.

चौकट

अशी झाली मागेल त्याला शेततळी...

  • *उत्तर तालुका- ५७०
  • * दक्षिण तालुका- ७२१
  • * मोहोळ तालुका - १२१५
  • * अक्कलकोट - ६९४
  • * बार्शी तालुका - ८७६
  • * माढा तालुका - १८१०
  • * करमाळा - ५३५
  • * पंढरपूर - १९८५
  • * सांगोला - १९७९
  • * मंगळवेढा - १०३५
  • * माळशिरस - ९९४
  • एकूण - १२, ४३२

* जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे ४७ हजार २५ अर्ज आले होते. त्यापैकी २२ हजार ५८२ शेततळ्यांना मंजुरी दिली होती. १२,४३२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली, तर योजना बंद होताना ३४५५५ शेततळी रद्द करण्यात आली.

 

मागील वर्षभरात दोन वेळा मागेल त्याला शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. मंजूर किंवा नामंजूर काहीच समजले नाही. मागील तीन वर्षांपासून चांगला पाऊस आहे, परंतु गरज म्हणून शेततळ्याचे काम करायचे आहे.

- निशिकांत देशमुख, अर्जदार शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी