शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

फडणवीस, अजितदादांचे सरकार बहुमत सिद्ध करू शकणारच नव्हते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:42 IST

आधीच होता सोलापूरकरांना विश्वास: महाविकास आघाडीचेच राज्य येणार असल्याचेही भाकित केले होते

ठळक मुद्देफडणवीस, अजितदादा सरकार टिकले तर गरिबांची कामे होतील - गौतम फडतरेमहाराष्ट्रातील जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही -विकास सूर्यवंशी सरकार शेतकरी विरोधी होते़ त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे - अ‍ॅड. राम कदम

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस व अजितदादांच्या सरकारला चोवीस तासांत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिल्यावर लोकांच्या मनात काय चालले आहे हे ‘लोकमत’ने मंगळवारी सकाळी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांनी हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही अशीच प्रतिक्रिया दिली अन् झालेही तसेच. दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला. 

देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी अचानकपणे राजभवनात जाऊन शपथविधी घेतल्यानंतर देशभर पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या सरकारला विश्वासदर्शक ठराव जिंकू देणार नाही असा चंग बांधला. सर्व आमदार एकत्रित केले आणि महाविकास आघाडीचेच सरकार येणार अशी घोषणा केली. दरम्यान, या दोघांच्या शपथविधीला न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने फडणवीस व अजितदादा यांना चोवीस तासांत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे बुधवारी या सरकारला विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार होते. हे सरकार टिकणार का याबाबत सोलापूरकरांच्या भावना जाणून घेतल्या. बहुतेकांनी हे सरकार टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली अन् झालेही तसेच. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी या दोघांनी राजीनामा दिला. 

फडणवीस, अजितदादा सरकार टिकले तर गरिबांची कामे होतील. भाजप सरकारने पाच वर्षांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केली. सरकारी कार्यालयात शिस्त आणली. त्यामुळे हे सरकार बहुमत सिद्ध करेल व सहा महिने तरी टिकेल असे वाटते़- लुणावत

हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. खरे तर महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.सत्तेचा जो लपंडाव सुरू आहे, खिचडी सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे जनादेशाचा आदर करून लागू केलेली राष्ट्रपती राजवट कायम ठेवावी. - गौतम फडतरे

फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. हे सरकार शेतकरी विरोधी होते़ त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. हे दोघेही जाणार व महाविकास आघाडीचे सरकार येणार. शिवसेनेचाच विधानसभेवर भगवा फडकविणार असा मला विश्वास वाटतो. -विकास सूर्यवंशी

राज्यात सध्या त्रांगडी स्थिती आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आता थोड्या वेळानंतर एक वेगळीच बातमी येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे निश्चित काहीच सांगता येत नाही.- अ‍ॅड. राम कदम

भाजपने अवैधपणे अजित पवार यांना हाताशी धरून अचानकपणे शपथविधी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला,पण त्यांचा आनंद फार काळ टिकणार नाही.विधीमंडळात हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार. - तन्मय कदम

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक