शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

कारखानधारकांनो, धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा, सदाभाऊ खोत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:07 PM

साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़.

ठळक मुद्देबैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीसाखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरूमराठा, धनगर आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि २४ : यावर्षी साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ कपाळाला कुंकू लावून मी आलो नाही तर शेतकºयांसाठी कपाळाचे कुंकू पुसून मैदानात आलो आहे. जनतेचे प्रश्न सामंजस्याने व वेळप्रसंगी संघर्षाने सोडविण्यासाठी क्रांती संघटना काम करीत आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़ गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, अ‍ॅड़ सोमनाथ वाघमोडे, जयवंत बगाडे, पं़ स़ सदस्य माऊली पाटील, अजय सकट, स्वप्नील वाघमारे, नगरसेवक मारुती देशमुख, रणजित मोटे, भगवान थोरात, डॉ़ तुकाराम ठवरे, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब सरगर, साहेबराव देशमुख, श्रीलेखा पाटील, विकास धार्इंजे, सचिन पडळकर, सुरेश तरंगे, बाळासाहेब कर्णवर, भीमराव शेंडगे, भानुदास सालगुडे, भैय्याजी पुकळे, सुरेश वाघमोडे, सरपंच ज्ञानू कांबळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका अधिकारी नंदकुमार म्हसवडे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, मंत्रालय सहा़ अजय वगरे, ग्रामसेवक रवींद्र पवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते़प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला़ गोरडवाडी गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून शेवटच्या शौचालयाचा लोकार्पण यावेळी करण्यात आला़ याप्रसंगी जिल्ह्यातील पहिल्या रयत क्रांती संघटनेची शाखा स्थापन करून त्याचे उद्घाटन करण्यात आले़ पहिले तृतीयपंथी सरपंच ज्ञानू कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी दुकानदार संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जयवंत बगाडे, भाजपाचे पांडुरंग वाघमोडे, लक्ष्मण गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच लक्ष्मण गोरड, रयत क्रांतीचे विष्णू गोरड, सरपंच भागवत कर्णवर, भिकाजी गोरड, रामचंद्र गोरड, खंडु कळसुले, पांडुरंग पिसे आदींनी परिश्रम घेतले़ प्रास्ताविक गोविंद कर्णवर यांनी केले तर आभार प्रा़ शरद कर्णवर यांनी मानले.-----------------------ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत़ बैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे़ कांदा चाळ, ठिबक सिंचन, रोगमुक्त बियाणे अशा कृषी खात्याच्या अनेक योजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत़ साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ पुढील काळात प्रत्येक गणात शेतकरी मेळावे घेण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़