शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक

By appasaheb.patil | Updated: July 28, 2021 16:44 IST

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला गती - भूसंपादनासंदर्भातील अहवाल सादर

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर-उस्मानाबादरेल्वे मार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. ३० गावांतील साधारण- दीड ते दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून रेल्वे धावणार असून, ट्रकसाठी लागणारी जमीन भूसंपादनासंदर्भातील अंतिम अहवाल रेल्वे प्रशासनाने सोलापूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूर ते उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी या मार्गाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती. या एजन्सीने संपूर्णपणे काम करून किती शेतकऱ्यांची किती जमीन जाणार यासंदर्भातील सातबारा उतारा यासह अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथील भूसंपादन कार्यालय व उस्मानाबाद येथील भूसंपादन कार्यालयास सादर केला आहे.

-----------

लवकरच होणार मोजणी...

भूसंपादन अहवाल सादर केल्यानंतर भूसंपादन अधिकारी यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या मार्गात जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा यासह अहवाल भूसंपादन विभागाला सादर करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------------

या गावांमधील जमीन भूसंपादन होणार

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे, केगांव, भोगांव, गुळवंची, कारंबा, बाणेगांव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगांव काटी, तामलवाडी, गंजेवाडी, सूरतगांव, सांगवी काटी, गोंधळवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगरूळपाटी, तुळजापूर, तडवळा, बोरी, बावी, वडगांव, पळसवाडी, देवळाली, शेखापूर, उस्मानाबाद, सांजाव जहाँगीरदारवाडीपर्यंत हा मार्ग असणार आहे.

--------

सेंटर लाईन मार्किंगचे काम सुरू

भूसंपादनासंदर्भात अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्यानंतर रेल्वेकडून सेंटर लाईन मार्किंगचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. ८० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेOsmanabadउस्मानाबाद