शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दररोज सोलापुरातील एक हजार भाविक जातात रेल्वेने बालाजीच्या दर्शनासाठी तिरूपतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:36 IST

आरक्षण मिळेना- बालाजीच्या दर्शनाला सोलापूरकरांची पसंती

सोलापूर - व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा...चा जयघोष आता रेल्वे डब्यातही घुमू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरहून तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या वाढल्याने तिरूपतीला जाणार्या चारही विशेष एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. या चारही गाड्यांचे आरक्षण मिळता मिळत नसल्याने शेकडो प्रवाशांना वेटिंगच करावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना रूग्णसंख्याकमी झाल्याने अनलॉकचा निर्णय झाला. अनलॉकच्या निर्णयात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबरोबरच रेल्वे प्रवासाला सुरूवात झाली. अनलॉकनंतर पहिल्या दोन दिवसात रेल्वेला प्रतिसाद कमी मिळाला असला तरी नंतर हळूहळू रेल्वेची प्रवासी वाहतुक रूळावर येऊ लागली आहे. सध्या पुणे, मुंबई बरोबरच बालाजीच्या दर्शनासाठी जाणार्या सोलापुरातील भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. दररोज सोलापूर रेल्वे स्थानकावरून दोन ते तीन एक्सप्रेस तिरूपतीला जातात अन् येतात. जास्त अंतर, कमी खर्चात प्रवास अन् दर्शन होत असल्याने अनेकजण रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडत आहेत.

-----------

या गाड्या जातात सोलापुरातून

  • उद्यान एक्सप्रेस
  • चेन्नई एक्सप्रेस
  • मदुराई एक्सप्रेस
  • तिरूपती एक्स्प्रेस
  • गदग एक्सप्रेस
  • हैद्राबाद एक्सप्रेस
  • निजामुद्दीन एक्सप्रेस

------------------

विजयपूर मार्गावर प्रवासी मिळेनात...

कोरोनामुळे विजयपूर मार्गावर धावणारी हसन व बसव एक्सप्रेस रद्द करण्यात आली. शिवाय निजामाबाद एक्सप्रेसही बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वेचे प्रवासी एसटी व खासगी वाहनाने प्रवास करू लागले. सध्या विजयपूर मार्गावर काही गाड्या धावत असल्या तरी या मार्गावरील रेल्वे गाड्यांना प्रवाशी मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

सर्वाधिक वेटिंग तिरूपती एक्स्प्रेसला

सोलापूर शहरातून दररोज १ हजारहून अधिक भाविक बालाजीच्या दर्शनाला तिरूपतीला जात आहेत. त्यामुळे या मार्गावर धावणारी तिरूपती, चेन्नई, मदुराई या तीन गाड्यांच्या तिकिटाला वेटिंगच दाखवित असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तिरूपतीला जाणार्या गाड्या हाऊसफुल्लच दिसून येत आहेत.

पॅसेजर कधी सुरू होणार ?

कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाने नियमित रेल्वे प्रवासी गाड्या बंद केल्या. याचवेळी पॅसेजर गाड्याही बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. दरम्यान, प्रवाशांना अडचण येऊ यासाठी अत्यावश्यक लोकांसाठी विशेष एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला. त्याच गाड्या सध्या धावत आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी रेल्वेची पॅसेजर सेवा कधी सुरू होणार असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव राजू कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटcentral railwayमध्य रेल्वे