शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

दररोज सोलापुरातील एक हजार भाविक जातात रेल्वेने बालाजीच्या दर्शनासाठी तिरूपतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:36 IST

आरक्षण मिळेना- बालाजीच्या दर्शनाला सोलापूरकरांची पसंती

सोलापूर - व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा...चा जयघोष आता रेल्वे डब्यातही घुमू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरहून तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या वाढल्याने तिरूपतीला जाणार्या चारही विशेष एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. या चारही गाड्यांचे आरक्षण मिळता मिळत नसल्याने शेकडो प्रवाशांना वेटिंगच करावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना रूग्णसंख्याकमी झाल्याने अनलॉकचा निर्णय झाला. अनलॉकच्या निर्णयात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबरोबरच रेल्वे प्रवासाला सुरूवात झाली. अनलॉकनंतर पहिल्या दोन दिवसात रेल्वेला प्रतिसाद कमी मिळाला असला तरी नंतर हळूहळू रेल्वेची प्रवासी वाहतुक रूळावर येऊ लागली आहे. सध्या पुणे, मुंबई बरोबरच बालाजीच्या दर्शनासाठी जाणार्या सोलापुरातील भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. दररोज सोलापूर रेल्वे स्थानकावरून दोन ते तीन एक्सप्रेस तिरूपतीला जातात अन् येतात. जास्त अंतर, कमी खर्चात प्रवास अन् दर्शन होत असल्याने अनेकजण रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडत आहेत.

-----------

या गाड्या जातात सोलापुरातून

  • उद्यान एक्सप्रेस
  • चेन्नई एक्सप्रेस
  • मदुराई एक्सप्रेस
  • तिरूपती एक्स्प्रेस
  • गदग एक्सप्रेस
  • हैद्राबाद एक्सप्रेस
  • निजामुद्दीन एक्सप्रेस

------------------

विजयपूर मार्गावर प्रवासी मिळेनात...

कोरोनामुळे विजयपूर मार्गावर धावणारी हसन व बसव एक्सप्रेस रद्द करण्यात आली. शिवाय निजामाबाद एक्सप्रेसही बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वेचे प्रवासी एसटी व खासगी वाहनाने प्रवास करू लागले. सध्या विजयपूर मार्गावर काही गाड्या धावत असल्या तरी या मार्गावरील रेल्वे गाड्यांना प्रवाशी मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

सर्वाधिक वेटिंग तिरूपती एक्स्प्रेसला

सोलापूर शहरातून दररोज १ हजारहून अधिक भाविक बालाजीच्या दर्शनाला तिरूपतीला जात आहेत. त्यामुळे या मार्गावर धावणारी तिरूपती, चेन्नई, मदुराई या तीन गाड्यांच्या तिकिटाला वेटिंगच दाखवित असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तिरूपतीला जाणार्या गाड्या हाऊसफुल्लच दिसून येत आहेत.

पॅसेजर कधी सुरू होणार ?

कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाने नियमित रेल्वे प्रवासी गाड्या बंद केल्या. याचवेळी पॅसेजर गाड्याही बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. दरम्यान, प्रवाशांना अडचण येऊ यासाठी अत्यावश्यक लोकांसाठी विशेष एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला. त्याच गाड्या सध्या धावत आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी रेल्वेची पॅसेजर सेवा कधी सुरू होणार असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव राजू कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटcentral railwayमध्य रेल्वे