शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 10:58 IST

पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले : पाशाभाई पटेल

ठळक मुद्देअनेक वर्षे मागणी असलेला मार्डीतून जाणारा सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग याच सरकारने मंजूर केला - रणजितसिंह मोहिते-पाटील कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाले तरच शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तुम्हाला मिळणार आहे - रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर: ब्राझीलमध्ये इथेनॉल सुरू झाल्यानंतर भारतात इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली?, पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले, असा घणाघाती आरोप कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी मार्डी येथे बोलताना केला. 

भाजप-सेना युतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारासाठी  मार्डीत झालेल्या सभेत ते बोलत होते. जगात इंधन आयात करणाºया देशात सर्वाधिक इंधन आयात करणारा देश भारत असल्याचे सांगत पटेल यांनी आकडेवारीच सादर केली. ब्राझीलमध्ये १९३१ मध्ये इथेनॉल तयार होऊ लागले, ते भारतात २००१ मध्ये सुरू झाले. शेतकºयांचा कळवळा असलेल्या काँग्रेसने इथेनॉल तयार करण्यासाठी ७० वर्षे का लावली? असा सवाल पटेल यांनी विचारला. 

शरद सूत गिरणी कोण बंद पाडली?, उत्तर सोलापूर तालुका खरेदी-विक्री संघाची मालमत्ता कोण विकली?, जिल्हा बँकेचे कर्ज सोसायटीतून कोणाच्या बगलबच्च्यांना मिळते?, शिरापूरचे पाणी १५ वर्षे तालुक्याला का मिळाले नाही?, बाजार समितीच्या बैठकीत ५६ विषय अडीच मिनिटात मंजूर कसे होतात?, याची उत्तरे तालुक्यातील काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांना विचारा, असे आवाहन उपस्थितांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, अनुसूचित जाती समितीचे अध्यक्ष सुभाष पारवे, भारत जाधव यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख शहाजी भोसले, सुधीर गोरे, सभापती संध्याराणी पवार, इंद्रजित पवार, शिवाजी सोनार, राजू हौशेट्टी, राजू सुपाते, श्रीमंत बंडगर, काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा आम्हाला विश्वास- रणजितसिंह अनेक वर्षे मागणी असलेला मार्डीतून जाणारा सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग याच सरकारने मंजूर केला, पूर्वी केंद्राने एक रुपया पाठविला तर गावात १५ पैसे येत होते, आता संपूर्ण रुपया गावात येतो, असे सांगत कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाले तरच शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तुम्हाला मिळणार आहे, हे काम करण्याचा आम्हाला विश्वास असल्याचे माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPasha Patelपाशा पटेलBJPभाजपाcongressकाँग्रेस