शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापूर विद्यापीठात वातावरण, हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:00 IST

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने भारत सरकारच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाशी आज सामंजस्य करार केला असून, यानुसार विद्यापीठात ...

ठळक मुद्देपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांना हवामान विभागातील बारकावे समजतील व चांगल्या प्रकारे संशोधन करण्यास एक संधी विद्यार्थ्यांना करार झाल्यानंतर या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही मिळणार

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने भारत सरकारच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाशी आज सामंजस्य करार केला असून, यानुसार विद्यापीठात वातावरण आणि हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याशिवाय संशोधनाची सोयही करण्यात आली आहे. यामुळे अभ्यासक, संशोधकांना एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय  बैठक पार पडली. या बैठकीस मुंबईतील भारतीय हवामानशास्त्र पश्चिम विभागाचे संचालक डॉ. सुनील कांबळे यांच्यासह विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर. बी. भोसले, पदार्थविज्ञान संकुलाचे संचालक डॉ. एस. एस. सूर्यवंशी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. के. पवार, डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ. धवल कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रारंभी पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी  स्वागत केले.

यावेळी डॉ. कांबळे म्हणाले की, देशातील वातावरणाची माहिती संकलन करून त्यासंदर्भात अन्य विभागांना मार्गदर्शन करण्याचे काम भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून केले जाते.

जागतिकीकरणामुळे देश बदलला आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे माहिती गोळा करणे व माहिती मिळवणे सोपे झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातही फार मोठे बदल झाले आहेत. अलीकडच्या काळात हवामानाविषयी अचूक माहिती देण्याचे काम या विभागाकडून होत असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

 विद्यापीठाने जर यासोबत अनेक उपक्रम राबवण्याचे ठरवल्यास विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच प्रशिक्षण, प्रोजेक्ट, कार्यशाळा तसेच रोजगाराभिमुख कार्यक्रमासाठी फायदा होणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी यावेळी सांगितले.

 या बैठकीस भूशास्त्र आणि पदार्थविज्ञान संकुलातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक आदी उपस्थित होते.

संशोधनासह इंटर्नशिप करण्याची संधी...- कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांना हवामान विभागातील बारकावे समजतील व चांगल्या प्रकारे संशोधन करण्यास एक संधी मिळेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांना करार झाल्यानंतर या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही मिळणार आहे, असे डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरTemperatureतापमानenvironmentवातावरण