शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

लॉकडाऊन संपवा मात्र जिल्हाबंदी कायम ठेवा..!

By appasaheb.patil | Updated: April 8, 2020 10:01 IST

सोशल मीडियावर सोलापूरकरांचे मत; दुकाने सुरू ठेवा अन् जमावबंदी कायम ठेवा...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागूसर्वसामान्यांचं जगणं झाले मुष्कीलअन्नधान्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावर

सोलापूर : देशातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे़ या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे़ या बंदमुळे सर्वसामान्यांचे हाल होतानाचे पहावयास मिळत आहे़ शिवाय गोरगरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणखीन काही दिवस लॉकडाउन वाढण्याची शक्यता सध्या सोशल मिडियावर होत असलेल्या व्हायरल मॅसेजमुळे वर्तविण्यात येत आहे़ खरंच लॉकडाऊनची मुदत वाढवावी की कमी करावी याबाबत सोलापूरकरांच्या मनात काय आहे याबद्दल लोकमत च्या टिमने काही लोकांशी संवाद साधला़ लॉकडाऊन हटवा...जिल्हाबंदी कायम ठेवा, नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे, स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक असेल तर घराबाहेर पडा, विनाकारण एकाठिकाणी गर्दी करू नको, शासनाच्या नियमांचे पालन करा असा एक नाही अनेक प्रकारची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

लॉकडाउनमुळे माझ्या दुकानात अनेकांचे मोबाईल दुरूस्ती होऊन पडलेले आहेत़ ग्राहकांचे वारंवार फोन येत आहेत़ आमचा मोबाईल द्या, आम्हाला गरज आहे़़़पण लॉकडाऊनमुळे दुकान उघडता येईना त्यामुळे शेकडो ग्राहकांचे मोबाईल तसेच पडून आहेत़ शासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, कडक उपाययोजनाव्दारे कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत़ विनाकारण घराबाहेर न पडता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, कोरोनामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा़- स्वप्नील जाधव,मोबाईल विक्रेता, सोलापूर

आमचा इस्त्रीचा व्यवसाय आहे़ आम्ही नवरा-बायको दोघेही इस्त्री मारण्याचे काम करतो़ मात्र लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय मागील दहा ते बारा दिवसांपासून बंद आहे़ आमच्या घरात आर्थिक अडचण सुरू आहे़ ज्यांचे कपडे तयार आहेत तेही दुकान बंद असल्यामुळे देता येत नाहीत. होय सरकार आमच्या चांगल्यासाठीच निर्णय घेत आहे पण त्यातही थोडया प्रमाणात सुट द्यावी, लॉकडाऊन हटवावे, गोरगरीबांना जगण्यासाठी मदत करावी़- सागर राऊत, लॉड्री व्यावसायिक, सोलापूर

देशात लॉकडाऊन स्थितीमुळे कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होत आहे़ इतर देशापेक्षा भारतात रूग्णांची संख्या कमी आहे़ शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचे खरेच कौतुक करायला हवे़ पण लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल होऊन बसले आहे़ लॉकडाऊन काढल्यास सर्वसामान्यांना काम मिळेल, पैसा मिळेल अन त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील़ सर्वच काही बंद असल्यामुळे माणूस घरात बसून बसून वेडा होऊ लागला आहे़ लॉकडाऊन काढल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल़- सुशीला कुंभार,सर्वसामान्य नागरिक, सोलापूर

या लॉकडाऊन निर्णयामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे़ हाताला काम नाही, खायला अन्न नाही काय करायचं़ कोरोनाने मरण्यापेक्षा अन्नपाण्याविना लोक मरतील. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत़ नागरिकांनीही शासनाच्या प्रत्येक उपाययोजनांचा साथ द्यायला हवी मात्र शासनाने लॉकडाऊन उघडल्यास सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुंदर होईल़ त्वरीत लॉकडाऊन मागे घ्यावे, आणखीन काही दिवस वाढवू नये़- अर्चना जाधवनागरिक, सोलापूर

मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर १४ तारखेपर्यंत असणारे लॉकडाऊन जुनपर्यंत असणार आहे असे मॅसेज व्हायरल होत आहेत़ त्यामुळे काहीच कळतं नाही की ते लॉकडाऊन कधी संपणार आहे की वाढणाऱ शासनाने देशातील कोरोनाची संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवावे़ जेणेकरून संसर्ग होऊन रूग्णांची संख्या वाढणार नाही़ नागरिकांनी कोरोनापासून मुक्त होण्यासाठी घराबाहेर पडणं टाळावे, स्वच्छता राखावी, सोशल मिडियावर फिरणाºया संदेशावर विश्वास ठेऊ नका़- अमोल शहा,महाविद्यालयीन विद्यार्थी, सोलापूर

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस