शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:05 IST

संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. 

ठळक मुद्देस्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंदमागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. स्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा अंतरिम आदेश ६ आॅक्टोबर २०१७ रोजी काढला होता. प्रादेशिक सहसंचालक(साखर) यांनी ही कारवाई करीत अवसायकाची नेमणूक केली होती.  जिल्हा बँक व कारखान्याला म्हणणे सादर करण्याची संधी दिली होती. जिल्हा बँकेच्या वतीने सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिलेल्या खुलाशात कारखान्याने घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी अवसायक नेमल्यास अडचण येणार असून कर्ज बुडीत होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याने अवसायक नेमणे अयोग्य असल्याचे जिल्हा बँकेच्या खुलाशात म्हटले आहे.साखर कारखान्याच्या वतीने माजी अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी संस्था मोडकळीस आणणे योग्य होणार नाही, अवसायक नेमल्याने शेतकरी ऊस उत्पादकांचे नुकसान होणार आहे असे म्हटले आहे. अवसायक न नेमता कारखाना सुरू करुन बँकांची देणी वरचेवर कमी करणे व एफ.आर.पी. ची रक्कम देणे सोयीचे होण्यासाठी अवसायक नेमू नये असे खुलाशात पाटील यांनी म्हटले होते. कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला आहे. कारखान्याचे अवसायक (परिसमापक) म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी बँक प्रमोद देशमुख यांची नियुक्ती कायम ठेवली आहे. ----------------------संतनाथ नंतर स्वामी समर्थच्वैरागच्या संतनाथ साखर कारखान्यावर यापूर्वीच अवसायक नेमला आहे. शंकर साखर कारखान्याचे प्रकरण न्यायालयात लटकले आहे. स्वामी समर्थ कारखान्यावर मात्र अवसायक नेमण्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालकांनी घेतला आहे. एकीकडे जिल्ह्यात ४० वा साखर कारखाना अक्कलकोट तालुक्यात उभारला जात असताना याच तालुक्यातील पहिला साखर कारखाना आर्थिक अडचणीत अडकला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने