शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:05 IST

संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. 

ठळक मुद्देस्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंदमागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. स्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा अंतरिम आदेश ६ आॅक्टोबर २०१७ रोजी काढला होता. प्रादेशिक सहसंचालक(साखर) यांनी ही कारवाई करीत अवसायकाची नेमणूक केली होती.  जिल्हा बँक व कारखान्याला म्हणणे सादर करण्याची संधी दिली होती. जिल्हा बँकेच्या वतीने सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिलेल्या खुलाशात कारखान्याने घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी अवसायक नेमल्यास अडचण येणार असून कर्ज बुडीत होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याने अवसायक नेमणे अयोग्य असल्याचे जिल्हा बँकेच्या खुलाशात म्हटले आहे.साखर कारखान्याच्या वतीने माजी अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी संस्था मोडकळीस आणणे योग्य होणार नाही, अवसायक नेमल्याने शेतकरी ऊस उत्पादकांचे नुकसान होणार आहे असे म्हटले आहे. अवसायक न नेमता कारखाना सुरू करुन बँकांची देणी वरचेवर कमी करणे व एफ.आर.पी. ची रक्कम देणे सोयीचे होण्यासाठी अवसायक नेमू नये असे खुलाशात पाटील यांनी म्हटले होते. कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला आहे. कारखान्याचे अवसायक (परिसमापक) म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी बँक प्रमोद देशमुख यांची नियुक्ती कायम ठेवली आहे. ----------------------संतनाथ नंतर स्वामी समर्थच्वैरागच्या संतनाथ साखर कारखान्यावर यापूर्वीच अवसायक नेमला आहे. शंकर साखर कारखान्याचे प्रकरण न्यायालयात लटकले आहे. स्वामी समर्थ कारखान्यावर मात्र अवसायक नेमण्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालकांनी घेतला आहे. एकीकडे जिल्ह्यात ४० वा साखर कारखाना अक्कलकोट तालुक्यात उभारला जात असताना याच तालुक्यातील पहिला साखर कारखाना आर्थिक अडचणीत अडकला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने