शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

सोलापूर बाजार समितीची निवडणुक दिलेल्या मुदतीत होणार नाही , जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकरणाला कळविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:10 PM

सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.सोलापूर बाजार समितीची १६ एप्रिल व बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्चपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेतआता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका की ई.व्ही.एम. मशीनद्वारे मतदान होणार?

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.सोलापूर बाजार समितीची १६ एप्रिल व बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्चपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका होणार नाहीत, हे आता स्पष्ट दिसत असल्याने निवडणुका कधी होणार?, हे उच्च न्यायालयाला सांगावे लागणार आहे. मतदार यादीबाबत नियमावली नुकतीच आल्याने अद्याप प्रारुप मतदार यादीही तयार नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी अंदाजे किती कालावधी लागणार, हे कळविण्याच्या सूचना निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी साधारण मतदार यादीवर हरकतीपासून निवडणूक निकाल लागेपर्यंत ७० दिवस लागतील, असे कळविले आहे. निवडणूक प्राधिकरण यानुसार उच्च न्यायालयासमोर ही बाजू मांडणार आहे. ----------------------असा असेल कालावधी- प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवस हरकतीसाठी, आलेल्या हरकतींवर सुनावणी घेणे व निर्णय देण्यासाठी १० दिवस, पाच दिवस अंतिम मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. निवडणूक प्राधिकरणाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी ठेवला असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच दिवस, सहाव्या दिवशी छाननी, ७ व्या दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवस, एक दिवस निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ७ ते १५ दिवसांनंतर मतदान व तीन दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे, असा अंदाजे निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाला पाठविला आहे. -------------------ई.व्ही.एम. मशीनचा होणार वापर?- लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ई.व्ही.एम. मशीनचा वापर करण्यात आला होता. आजपर्यंतच्या मतपत्रिकेद्वारे होणाºया या निवडणुका मशीनद्वारे होत असल्याने आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका की ई.व्ही.एम. मशीनद्वारे मतदान होणार?, याचा निर्णय झालेला नाही. निवडणूक प्राधिकरणाकडे याबाबत चौकशी केली असता मतदारांच्या संख्येवर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती