शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

अतिवृष्टीचा परिणाम; नोव्हेंबर संपत आला तरी रब्बीची पेरणी ५९ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 7:23 PM

सोलापूर जिल्ह्यातील चित्र; हंगाम लांबल्याने हरभरा, गव्हावर भर

सोलापूर : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पाणी न हटल्याने नोव्हेंबर संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेरण्या सुरूच आहेत. हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाची लागवड करण्यावर भर दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५० हजार ८१७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणीला सुरूवात केली जाते. पण यंदा याच काळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले गेले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पेरण्या होण्यास अडचण निर्माण झाली. सखल भागातील पाणी आटल्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या. पण ओढे, नाले, कालवे आणि नदी शेजारी असलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने पेरण्या करता आल्या नाहीत. वाफसा येईल तसे शेतकऱ्यांनी पेरण्यास सुरूवात केली आहे. आता ज्वारीच्या पेरणीला विलंब झाल्याने गहू व हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

१८ नोव्हेंबरअखेर ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे असून, कंसातील आकडे सरासरी क्षेत्र दर्शवित आहेत. ज्वारी: २ लाख २७ हजार ३५५ (३ लाख ५0 हजार), मका: १८ हजार ७२१ (३४ हजार २५८), गहू: ९ हजार ८0 (३८ हजार ८0३), हरभरा: ३३ हजार ११२ (५७ हजार ७९), तीळ: १४ (२३), जवस: १२२ (१४७), सूर्यफूल: ७५ (२ हजार २0५), करडई: ७५0 (२ हजार ६२७).

ऊस लागवडीवर भर

अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी पेरणीला विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता गहू व हरभऱ्याच्या पेरणीवर भर दिला आहे. त्याचबरोबर उसाचे क्षेत्र घटले होते. पण आता पाण्याची सोय झाल्याने सिंचन असलेले शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळले असून, लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.  

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूर