शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयातून हवे निसर्ग शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 13:01 IST

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल.

दिवसेंदिवस मानवाचं निसर्गावरचं कमी होत जाणारं प्रेम आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक होत असलेलं दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी मानवालाच शापित ठरणार आहेत. निसर्गापासून दूर जाण्याची मानवाची वृत्तीच या जागतिक आणि प्रादेशिक पर्यावरणीय समस्येला कारणीभूत आहे. क्षणाक्षणाला कमी होत असलेला ओझोनचा थर आणि वाढत चाललेले प्रदूषण, त्याचप्रमाणे संपत जाणारे जमिनीतील पाण्याचे साठे आणि निसत्व होत असलेली शेतजमीन, या आणि अशाप्रकारच्या अनेक समस्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत. या साºया समस्यांचं एकच उत्तर, पर्यावरण संवर्धन !

आपलं सारं जीवन ज्या निसर्गावर अवलंबून आहे त्या निसर्गाकडे आपण पाठ फिरवणे कितपत योग्य आहे याचा विचार आज सर्वच थरातून होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात ‘निसर्ग शिक्षण’ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळानं आज काही प्रमाणात पर्यावरण-शिक्षणाचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे, यासाठी मंडळाचे आपण आभार मानलेच पाहिजेत. परंतु या निसर्ग-शिक्षणाला आणखी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं, ही आजची नव्हे आताची गरज बनली आहे. निसर्ग-शिक्षण हे शाळेच्या चार भिंतीतले आणि त्याच्या बाहेरचे देखील असायला हवे. निसर्ग शिक्षणामध्ये ‘उपक्रमशीलता’ आणि ‘कृतिशीलता’ असायला हवी.

शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाणारे हवे, निसर्गाशी नाते जोडणारे आणि ‘निसर्ग माझा सखा, निसर्ग माझा बंधू’ अशी वैश्विक भावना निर्माण करणारे शिक्षण हवे. या शिक्षणातून आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांवरती आधी प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

दैनंदिन जीवनामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी, कृतिशीलता कशी असावी, कोणत्या चांगल्या सवयी आपण अंगीकाराव्यात, अशा अतिशय सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात. 

विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व त्यांची निगा, पर्यावरणपूरकता, स्वच्छता या गोष्टी पुन्हा एकदा बाळबोध पद्धतीने सांगणे, ही आजची गरज बनली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्याला आता महामंत्राइतके महत्त्व द्यावे लागणार आहे. पर्यावरणपूरकतेचे महत्त्व समजावून सांगावे लागणार आहे. स्वच्छता त्यांच्या अंगी भिनवावी लागणार आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने घेणे गरजेचे आहे. आठवड्यातून एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणे, भटकंती करणे, निसर्गातल्या नवनवीन गोष्टी शिकणे, श्रमदान करणे या गोष्टी लहानपणातच रुजवणे महत्त्वाचे आहे. वनस्पती, झाडेझुडपे, पानेफुले यांची शास्त्रशुद्ध माहिती, जलसाठे, ओढे, नाले स्वच्छ ठेवणे याबाबत सजगता आणायला हवी. पाण्याचा जपून वापर करणे, सायकलीचा वापर करणे, नैसर्गिक साधनांचा वापर वाढविणे, पाण्याचे महत्त्व जाणणे, शक्य तेवढे पायी चालणे, वाहनांचा वापर कमी करून रस्त्यांवरील गर्दी व प्रदूषण, या व अशा अनेक गोष्टींद्वारे शालेय आणि महाविद्यालयीन पातळीपासून विविध मोहीम राबवणे महत्त्वाचे आहे. 

निसर्गावर मनस्वी प्रेम करणारी, त्याची काळजी वाहणारी, निसर्गाचं महत्त्व जाणणारी कोणतीही व्यक्ती ही संवेदनशील आणि सर्वगुणसंपन्न असते. समानता, सर्वसमावेशकता, संयम, सहनशीलता, नेहमी इतरांना आनंद देणाºया गोष्टी निसर्गामध्ये आहेत. ऋषितुल्य झाडे, मन मोहून टाकणारी फुले, निरागस प्राणी-पक्षी, विशाल आकाश, शांत आणि तटस्थ डोंगराच्या रांगा यांच्याकडे पाहून आपण या गोष्टी शिकायला हव्यात. यासाठी निसर्ग भ्रमंती आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल आणि याच संवेदनशील पिढीच्या माध्यमातून आपला देश पुढे जात राहील.- अरविंद म्हेत्रे(लेखक निसर्ग माझा सखा परिवाराचे समन्वयक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा