शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

शाळा-महाविद्यालयातून हवे निसर्ग शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 13:01 IST

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल.

दिवसेंदिवस मानवाचं निसर्गावरचं कमी होत जाणारं प्रेम आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक होत असलेलं दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी मानवालाच शापित ठरणार आहेत. निसर्गापासून दूर जाण्याची मानवाची वृत्तीच या जागतिक आणि प्रादेशिक पर्यावरणीय समस्येला कारणीभूत आहे. क्षणाक्षणाला कमी होत असलेला ओझोनचा थर आणि वाढत चाललेले प्रदूषण, त्याचप्रमाणे संपत जाणारे जमिनीतील पाण्याचे साठे आणि निसत्व होत असलेली शेतजमीन, या आणि अशाप्रकारच्या अनेक समस्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत. या साºया समस्यांचं एकच उत्तर, पर्यावरण संवर्धन !

आपलं सारं जीवन ज्या निसर्गावर अवलंबून आहे त्या निसर्गाकडे आपण पाठ फिरवणे कितपत योग्य आहे याचा विचार आज सर्वच थरातून होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात ‘निसर्ग शिक्षण’ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळानं आज काही प्रमाणात पर्यावरण-शिक्षणाचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे, यासाठी मंडळाचे आपण आभार मानलेच पाहिजेत. परंतु या निसर्ग-शिक्षणाला आणखी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं, ही आजची नव्हे आताची गरज बनली आहे. निसर्ग-शिक्षण हे शाळेच्या चार भिंतीतले आणि त्याच्या बाहेरचे देखील असायला हवे. निसर्ग शिक्षणामध्ये ‘उपक्रमशीलता’ आणि ‘कृतिशीलता’ असायला हवी.

शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाणारे हवे, निसर्गाशी नाते जोडणारे आणि ‘निसर्ग माझा सखा, निसर्ग माझा बंधू’ अशी वैश्विक भावना निर्माण करणारे शिक्षण हवे. या शिक्षणातून आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांवरती आधी प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

दैनंदिन जीवनामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी, कृतिशीलता कशी असावी, कोणत्या चांगल्या सवयी आपण अंगीकाराव्यात, अशा अतिशय सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात. 

विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व त्यांची निगा, पर्यावरणपूरकता, स्वच्छता या गोष्टी पुन्हा एकदा बाळबोध पद्धतीने सांगणे, ही आजची गरज बनली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्याला आता महामंत्राइतके महत्त्व द्यावे लागणार आहे. पर्यावरणपूरकतेचे महत्त्व समजावून सांगावे लागणार आहे. स्वच्छता त्यांच्या अंगी भिनवावी लागणार आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने घेणे गरजेचे आहे. आठवड्यातून एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणे, भटकंती करणे, निसर्गातल्या नवनवीन गोष्टी शिकणे, श्रमदान करणे या गोष्टी लहानपणातच रुजवणे महत्त्वाचे आहे. वनस्पती, झाडेझुडपे, पानेफुले यांची शास्त्रशुद्ध माहिती, जलसाठे, ओढे, नाले स्वच्छ ठेवणे याबाबत सजगता आणायला हवी. पाण्याचा जपून वापर करणे, सायकलीचा वापर करणे, नैसर्गिक साधनांचा वापर वाढविणे, पाण्याचे महत्त्व जाणणे, शक्य तेवढे पायी चालणे, वाहनांचा वापर कमी करून रस्त्यांवरील गर्दी व प्रदूषण, या व अशा अनेक गोष्टींद्वारे शालेय आणि महाविद्यालयीन पातळीपासून विविध मोहीम राबवणे महत्त्वाचे आहे. 

निसर्गावर मनस्वी प्रेम करणारी, त्याची काळजी वाहणारी, निसर्गाचं महत्त्व जाणणारी कोणतीही व्यक्ती ही संवेदनशील आणि सर्वगुणसंपन्न असते. समानता, सर्वसमावेशकता, संयम, सहनशीलता, नेहमी इतरांना आनंद देणाºया गोष्टी निसर्गामध्ये आहेत. ऋषितुल्य झाडे, मन मोहून टाकणारी फुले, निरागस प्राणी-पक्षी, विशाल आकाश, शांत आणि तटस्थ डोंगराच्या रांगा यांच्याकडे पाहून आपण या गोष्टी शिकायला हव्यात. यासाठी निसर्ग भ्रमंती आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल आणि याच संवेदनशील पिढीच्या माध्यमातून आपला देश पुढे जात राहील.- अरविंद म्हेत्रे(लेखक निसर्ग माझा सखा परिवाराचे समन्वयक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा