शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शिक्षण एके शिक्षण, शिक्षण दुणे शिक्षण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:08 IST

लॉकडाऊनचा काळ असूनसुद्धा एकेका दुकानात १ हजाराहून अधिक मोबाईलची विक्री झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देदैनंदिन जीवनात मोबाईल ही महत्त्वाची गरज झाली मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल घेणे अपरिहार्य मोबाईलच्या खरेदीत प्रचंड वाढ झाली

कोविड-१९ ने अभूतपूर्वरित्या सर्वच क्षेत्रात प्रवेश केला. शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. परिस्थितीला उत्तर देण्यासाठी पूरक म्हणून वापरले जाणारे आॅनलाईन शिक्षण मुख्य प्रवाहात आले. अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्यांचा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली. शिक्षण हे अमर्याद आहे. शिक्षणाची निश्चित अशी परिपूर्ण व्याख्या करणे अशक्यच! शिक्षण घेण्यासाठी  पंचेद्रियांच्या योग्य वापरानुसार त्यांच्या क्षमतेनुसार अनुभूती दिल्या जातात. जेणेकरुन तो अनुभव त्याच्या दीर्घकाळ स्मरणात राहावा. शिक्षणातील पंचेद्रियांचा वापर आॅनलाईन शिक्षणाच्या कोणत्या कप्प्यात होणार?

शिक्षण हे मन,मेंदू, शरीर बळकट करण्यासाठी असायला हवंय, आॅनलाईन शिक्षणाने ही बळकटी कशी आणता येईल ? वर्गातच विद्यार्थी शिकतो ही  केवळ कल्पना आहे. मुलं कुठंही शिकतातच त्याला कोणतीच मर्यादा नाही. आॅनलाईन शिक्षण काळाची गरज म्हणून आपण स्वीकारलीच आहे. जिथं सर्व शिक्षक टेक्नोसेव्ही नसताना खूप कष्ट करून एखादा व्हिडिओ तयार करतात.टेस्ट तयार करतात; मात्र त्याला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता, आॅनलाईन शिक्षण चालू आहे हे म्हणणं फार धाडसाचंच होईल.सर्व पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील हे कशाच्या आधारावर गृहित धरलं गेलं ? सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध होतीलच हे कसे मानले? तरीही आॅनलाईन शिक्षण सुरू केले.पालकांकडे त्यांच्याच कामासाठी मोबाईल्स असणार ते त्यांच्या मुलांना कितपत देत असतील किंवा देऊ शकतील त्यामध्ये हाही महत्त्वाचा प्रश्न. 

दैनंदिन जीवनात मोबाईल ही महत्त्वाची गरज झाली आहे. त्यातून मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल घेणे अपरिहार्य झाल्याने इतक्या कठीण परिस्थितीतही मोबाईलची खरेदी हा भार पालकांवर पडलाच... होणारा परिणाम म्हणजे मोबाईलच्या खरेदीत प्रचंड वाढ झाली.  

लॉकडाऊनचा काळ असूनसुद्धा एकेका दुकानात १ हजाराहून अधिक मोबाईलची विक्री झाल्याचे दिसून आले. वर्षा-दोन वर्षांचा धंदा २-३ महिन्यात झाला. पण याचा अर्थ प्रत्येक पालकाकडे-विद्यार्थ्यांकडे मोबाईलची उपलब्धता झालीच असे म्हणता येत नाही. त्यात पुन्हा हायस्पीड डाटाचा वेगळाच खर्च !

शहरी भागातील नोकरदारांसाठी श्वासाइतकंच महत्त्वाचं असलेलं गॅझेट, आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील लोकांना हे गॅझेट्स वगैरे रोजच्या बाजारहाटाप्रमाणे खरेदी करण्यासारख्या गोष्टी असल्या म्हणून त्यांच्या मुलांचं आॅनलाईन शिक्षण योग्य प्रकारे होत आहे असे म्हणणे देखील अशक्यच आहे. शिक्षकांपेक्षा,पालकांपेक्षा मुलं अनेक गॅझेट्सचा वापर सहज करताना दिसतात, पण त्यांचा शालेय शिक्षणासाठीच उपयोग करतील अशी खात्री देता येणार नाही. 

अनेक लिंक्स मुलांना दिसणार, मुलं उत्सुकतेने त्या लिंक्स ओपन करणार, मग त्यांना काय काय पाहावे लागणार याची कल्पनाच न केलेली बरी. आॅनलाईन शिक्षण घेता घेता मुलं अनेक गोष्टींना बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी काही नियम,अलर्टस् मुलांनाही आणि पालकांनाही माहीत व्हायला हव्यात. पण धोके माहीत असूनही बळी पडणाºयांची संख्या जास्त असू शकते. आपली मुलं गॅझेट्स घेऊन काय काय करत असतील याची पालकांना कितपत माहिती असू शकेल? मुलांचा स्क्रीन टाइम किती वाढला आहे. त्याचा नेमका परिणाम मुलांच्या शरीरावर, मानसिकतेवर काय होतोय याचाही विचार आॅनलाईन शिक्षण घेताना अत्यावश्यक वाटते. म्हणजे याचा वापर किती टक्के करावा, शिकण्यात याला काहीतरी मर्यादा हवीच.

मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या म्हणण्यानुसार ‘एकूणच शिकणे-शिकवणे या प्रक्रियेत गॅझेट्सचा वापर १० टक्के असावा.’ म्हणजे पंचपक्वानातील ताटात असलेले लोणचेच! इतकंच महत्त्व असावं खरं तर आॅनलाईन शिक्षणाला.  त्यातही संविधानाला अनुसरून शिकण्यासाठीचा आशय असणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे संविधानिक मूल्यांची जपणूक होईल असाच आशय असेल तरच त्या शिक्षणाला अर्थ असेल. हे कसे समजणार पालकांना, मुलांना? रोज फेसबुकवर,व्हॉट्सअ‍ॅपवर ज्ञान- अज्ञानाचे रतीब घालणे सुरू असते, अशावेळी यावर उपाय म्हणून जास्तवेळ मोबाईल मुलांकडे राहणार नाही या पद्धतीने अभ्यासाचे नियोजन करणे कस शक्य आहे हे पाहायला हवे.- सरिता फडके,(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलEducationशिक्षणSchoolशाळा