शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कर्जमाफीत कमावलं... अवकाळीनं गमावलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:10 IST

 द्राक्षासह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान; कडबाही काळा पडण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला

ठळक मुद्देअवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबलीअवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आलेशहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस

सोलापूर : पेरणीपूर्व मशागत़़़ त्यानंतर योग्य त्यावेळी खुरपणी, फवारणी, खतांची मात्रा देऊन मोठ्या कष्टाने पिके जोमात आणली़ सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे़ काही ठिकाणी खळेही सुरू आहे. त्यातच रातोरात अवकाळी पावसाने शेतकºयांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या पिकांवर पाणी पाडून त्यांच्या कष्टाचे मोल शून्य केले़ या अवकाळी पावसामुळे ज्वारी, कडबा काळा पडणार तर द्राक्ष बागेतील मणी पडून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ एकीकडे शनिवारीच शासनाने शेतकºयांना कर्जमाफीत कमावलं तर दुसरीकडे नैसर्गिक संकटाने शेतकºयांचा चिंतेत टाकत सर्वकाही गमावलं आहे.

शहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. रविवारी सायंकाळी दुसºया दिवशीही सुमारे पाऊणतास पावसाची रिपरिप होती. रविवारी रात्री साडेआठपर्यंत सात मिलिमीटर पाऊस पडला. तत्पूर्वी शनिवारी रात्री आठ मिलिमीटर पाऊस  पडला.

रविवारी दिवसभर नेहमीसारखे ऊन पडले होते. वातावरणात  उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होती.  सायंकाळी सहा वाजेपर्यंत आकाश निरभ्र होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली.  तासाभरात पावसाचे टपोरे थेंब कोसळायला सुरुवात झाली. त्याचवेळी जोरदार वारेही वाहू लागले. काहीवेळात  पावसाची रिपरिप सुरु झाली. होटगी रोड, विजापूर रोड  यासह गावठाण भागातील पांजरापोळ चौक, बाळीवेस,  चौपाड, एम्प्लॉयमेंट चौक परिसर, सिद्धेश्वर मंदिर  येथेही पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.

अवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबली आहे. द्राक्ष विक्री योग्य झाल्याने व्यापाºयांनी द्राक्ष बागा चढ्या दराने घेण्यास सुरुवात केली होती. ४० ते ५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. परंतु अवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. व्यापारी मात्र द्राक्ष बागा घेण्यास धजावत नसल्याने याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे़,  अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी उतरून ते तडकलेल्या मण्यात शिरते. त्यामुळे प्रथम मणी नासण्याची क्रिया चालू होते. ते नासलेले पाणी पूर्ण द्राक्ष घडात उतरते व पूर्ण घड नासतो. औषध फवारणी करूनही त्याचा उपयोग होत नाही. परंतु द्राक्ष घडातील पाणी काढून सुकविण्यासाठी हवेची फवारणी सातत्याने करावी लागते़ हाच एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी