शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत कमावलं... अवकाळीनं गमावलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:10 IST

 द्राक्षासह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान; कडबाही काळा पडण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला

ठळक मुद्देअवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबलीअवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आलेशहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस

सोलापूर : पेरणीपूर्व मशागत़़़ त्यानंतर योग्य त्यावेळी खुरपणी, फवारणी, खतांची मात्रा देऊन मोठ्या कष्टाने पिके जोमात आणली़ सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे़ काही ठिकाणी खळेही सुरू आहे. त्यातच रातोरात अवकाळी पावसाने शेतकºयांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या पिकांवर पाणी पाडून त्यांच्या कष्टाचे मोल शून्य केले़ या अवकाळी पावसामुळे ज्वारी, कडबा काळा पडणार तर द्राक्ष बागेतील मणी पडून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ एकीकडे शनिवारीच शासनाने शेतकºयांना कर्जमाफीत कमावलं तर दुसरीकडे नैसर्गिक संकटाने शेतकºयांचा चिंतेत टाकत सर्वकाही गमावलं आहे.

शहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. रविवारी सायंकाळी दुसºया दिवशीही सुमारे पाऊणतास पावसाची रिपरिप होती. रविवारी रात्री साडेआठपर्यंत सात मिलिमीटर पाऊस पडला. तत्पूर्वी शनिवारी रात्री आठ मिलिमीटर पाऊस  पडला.

रविवारी दिवसभर नेहमीसारखे ऊन पडले होते. वातावरणात  उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होती.  सायंकाळी सहा वाजेपर्यंत आकाश निरभ्र होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली.  तासाभरात पावसाचे टपोरे थेंब कोसळायला सुरुवात झाली. त्याचवेळी जोरदार वारेही वाहू लागले. काहीवेळात  पावसाची रिपरिप सुरु झाली. होटगी रोड, विजापूर रोड  यासह गावठाण भागातील पांजरापोळ चौक, बाळीवेस,  चौपाड, एम्प्लॉयमेंट चौक परिसर, सिद्धेश्वर मंदिर  येथेही पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.

अवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबली आहे. द्राक्ष विक्री योग्य झाल्याने व्यापाºयांनी द्राक्ष बागा चढ्या दराने घेण्यास सुरुवात केली होती. ४० ते ५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. परंतु अवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. व्यापारी मात्र द्राक्ष बागा घेण्यास धजावत नसल्याने याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे़,  अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी उतरून ते तडकलेल्या मण्यात शिरते. त्यामुळे प्रथम मणी नासण्याची क्रिया चालू होते. ते नासलेले पाणी पूर्ण द्राक्ष घडात उतरते व पूर्ण घड नासतो. औषध फवारणी करूनही त्याचा उपयोग होत नाही. परंतु द्राक्ष घडातील पाणी काढून सुकविण्यासाठी हवेची फवारणी सातत्याने करावी लागते़ हाच एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी