शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विणी हंगाम काळातच उजनी धरणात बेसुमार मासेमारी झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:23 IST

मत्स्यबीज घटले; लॉकडाऊननंतर मागणी वाढल्याचा परिणाम

ठळक मुद्देउजनी शंभर टक्के भरूनही पाहिजे त्या प्रमाणात मासे सापडत नाहीत़ असे चित्र सगळीकडे दिसते आहेगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मासे अत्यल्प मिळत आहेत. लॉकडाऊननंतर माशांना मागणी वाढली आहे

अक्षय आखाडे

जेऊर : महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या उजनी धरणातील माशांना श्रावण आणि गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रातून मागणी वाढली आहे. काठोकाठ भरलेल्या उजनीतील पाण्यात मच्छीमारांना मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरवर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयातील माशांना मागणी वाढते; मात्र यंदा लॉकडाऊन असल्याने उजनी जलाशयातील मासेमारी उन्हाळ्यामध्ये बंद होती. त्यानंतर या माशांना महाराष्ट्रातून मागणी आली़ परिणामत: उजनीत बेसुमार मासेमारी सुरु झाली.

 मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर दरम्यान माशांचा विणीचा हंगाम असतो. ऐन विणीच्या हंगामात माशांना मागणी वाढली. या काळातच माशांचे बीज पाण्यात मोठ्या प्रमाणावर तयार होते. पण याच कालावधीमध्ये मासेमारी भरपूर झाली़ त्यामुळे पाण्यातील बीज कमी झाल्याने माशांची संख्या घटली आहे. उजनी जलाशयातील माशांचे प्रमाण कमी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे़ सध्याच्या काळात पुणे आणि धरण परिसरातील पावसामुळे उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे़ या जलाशयातील पाण्याचे प्रदूषण वाढल्याने गेल्या काही वर्षात इथल्या पाण्यात प्रामुख्याने चिलापी हा अत्यंत दूषित पाण्यातला मासा सापडतो़ धरणात सापडणाºया चिलापी या एकमेव  माशाचे प्रमाण देखील आता अत्यल्प ठरले आहे़ 

इंदापूर, भिगवणमध्ये होतो लिलाव  माशांसाठी इंदापूर आणि भिगवण हे दोनच मुख्य बाजारपेठ आहेत. उजनीकाठची ही मुख्य आणि मोठी गावे आहेत. शिवाय इथूनच उजनी जलाशयातील मासे शहरात पाठवले जातात. उजनी धरणाच्या शेजारील गावातील मासेमारी करणारे मच्छीमार इंदापूर आणि भिगवण येथे त्याची लिलाव पद्धतीने विक्री करतात़ येथूनच मासे इतर ठिकाणी वितरित होतात़ भिगवण येथील मासे हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत़ 

उजनी शंभर टक्के भरूनही पाहिजे त्या प्रमाणात मासे सापडत नाहीत़ असे चित्र सगळीकडे दिसते आहे. याचे शास्त्रीय कारण असे सांगता येईल की मे ते आॅगस्ट या चार महिन्यात माशांचा विणीचा हंगाम असतो. या काळात माशाचे बीज पाण्यात मोठ्या प्रमाणावर तयार होते. पण याच कालावधीमध्ये जर मासेमारी भरपूर झाली़ पाण्यात बीज कमी प्रमाणात तयार होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.- विकास काळे, उजनीचे अभ्यासक, केत्तूर

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मासे अत्यल्प मिळत आहेत. लॉकडाऊननंतर माशांना मागणी वाढली आहे; मात्र पाण्यात वाढलेले गवत नासल्याने पाणी देखील दूषित झाले आहे. शिवाय मासे देखील मिळत नाहीत़- दत्तात्रय डिरे, केत्तूर (ता़ करमाळा)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याUjine Damउजनी धरणwater pollutionजल प्रदूषण