शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतकºयाच्या घामातून तांदुळवाडी परिसरात बहरली मोहक गुलाबांची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 17:33 IST

संतोष आचलारे सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी-मुस्ती मार्गावर गुलाबी शेती बहरली असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत अत्यंत ...

ठळक मुद्देतांदुळवाडी परिसरातील ५० एकराचं क्षेत्र कमी पाण्यावरही फुललंगावातील अल्पभूधारक शेतकºयांचा हा प्रमुख व्यवसाय ठरलागुलाब फूल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विक्रीसाठी आणतात

संतोष आचलारे

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी-मुस्ती मार्गावर गुलाबी शेती बहरली असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत अत्यंत कमी पाण्यावर येथील परिसर शेतकºयांनी गुलाबी करून  टाकला आहे. शेतकºयांच्या चिकाटीमुळे येथील कुटुंबाला सक्षम रोजगार मिळत आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तांदुळवाडी गावाचा खवा उत्पादनासाठी नावलौकिक आहे. अजूनही ही गावाची ही ओळख कायम असतानाच गुलाबी शेती पिकविणारा म्हणून नवीन गावाची ओळख परिसरात होत आहे. 

गावातील सुमारे ५0 ते ६0 एकर क्षेत्रात शेतकºयांनी अर्धा एकर, एक एकर या प्रमाणात गुलाबी शेती केली आहे. गावातील अल्पभूधारक शेतकºयांचा हा प्रमुख व्यवसाय ठरला असून यातून आर्थिक सक्षमता निर्माण करण्यात आली आहे. 

गुलाब फूल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विक्रीसाठी आणतात.यासाठी शेतकºयांना भल्या पहाटे साडेचार वाजल्यापासूनच गुलाबांची काढणी करावी लागते. 

मजुरांकडून फुलं तोडून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.त्यामुळे शेतकरी कुटुंबातील सदस्यांकडून पहाटे फुलांची काढणी करण्यात येते. अंधारात फुलं काढताना अनेकदा काटे टोचतात, मात्र मळा पिकविण्याची जिद्द असल्याने येथील शेतकरी कष्टाने पहाटे फुले तोडताना दिसून येतात. दुचाकीवर रोजच सोलापूरला स्वत: शेतकरीच गुलाबाची फुलंही आणतात. 

अशी आहे लागवडीची पद्धतगुलाबी काड्यांची लावण जमिनीत करण्यात येते. रोपांची लावण झाल्यानंतर तीन महिन्यांत रोपांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. त्यानंतरच्या काळात गुलाबाची फुले लागतात. रोपांची योग्य वाढ होण्यासाठी पुरेशी आवश्यक खते देण्यात येतात. रोपांची योग्य वाढ होण्यासाठी काही प्रमाणात औषधांची फवारणीही करण्यात येते. रोपांची लागवड करताना शेणखत टाकण्यास येथील शेतकरी प्राधान्य देतात. रासाययिक खतांपेक्षा ही मात्रा अधिक चांगली ठरत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती