शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर येथे ५५ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 13:18 IST

लग्नकार्यातील खीर दुसºया दिवशी खाल्ली 

ठळक मुद्देविषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध, महिला, मुले यांचा समावेश लग्नातील भोजन आटोपल्यानंतर शिल्लक राहिलेली खीर त्यांनी गावातील ग्रामस्थांना वाटलीवयोवृद्ध १६ रुग्णांना मात्र उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले

अक्कलकोट: लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर (ता. अक्कलकोट) येथील ५० ते ५५ जणांना विषबाधा झाली. या सर्वांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

सलगर येथे दि. १७ डिसेंबर रोजी चंद्रकांत धडके यांच्या घरी लग्नकार्य होते. लग्नातील भोजन आटोपल्यानंतर शिल्लक राहिलेली खीर त्यांनी गावातील ग्रामस्थांना वाटली. ही खीर त्यांनी दुसºया दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत खाल्ली. त्यानंतर सर्वांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला. तत्काळ सरपंच सुरेखा गुंडरगी, उपसरपंच राजकुमार जमादार, पोलीस पाटील बिराजदार यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी अक्कलकोट येथे ग्रामीण रुग्णालयात हलविले. वयोवृद्ध १६ रुग्णांना मात्र उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले. सर्व जणांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले.

विषबाधा झालेल्यांमध्ये शरदा धडके,कस्तुरबाई  धडके, जयश्री कोळी, नसीमा बिराजदार, भाग्यश्री कोळी, निगवव्वा संगोळीगी,अमिना लालखा, रामचंद्र कोळी, अभिमन्यू जोगदे, कमल होटकर,निलाबाई कोळी, जरीना मुजावर, शिलवंती कोळी, कस्तुरबाई हडलगी, तुकाबाई चिकमळळी, सावित्री भडोळे, अंबिका नरुणे, नागम्मा जनवडे, कालव्वा कोळी, लक्ष्मण कोळी, हलीम गुळळो, श्रीशैल म्हेत्रे, रुकमबी गुळळो, मल्लिनाथ कोळी, नागम्मा  कोळी, महानंदा कोळी, सावित्री कोळी, निलम्मा कोळी, शशिकांत कोळी, लक्ष्मीकांत कोळी, रामचंद्र कोळी असे ५० ते, ५५ रुग्ण बाधित आहेत.

रुग्णालयाची तारांबळ- अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता ३० इतकी आहे. मात्र अचानक ५५ रुग्ण दाखल झाल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध, महिला, मुले यांचा समावेश आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य