शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

दुष्काळाची दाहकता; पाण्याअभावी हंजगी गावातील ग्रामस्थांनी केले स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:39 IST

हंजगी गावात तीव्र पाणीटंचाई; तलाव, बोअर, विहीर, अन्य पाण्याचे स्रोत पडले बंद

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईला सामोरे जात खडतर जीवन जगणाºया हंजगी ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या पाचविला पुजलेली आहेया गावाला जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई भासत आहे. यामुळे येथून अनेक लोक पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहे

अक्कलकोट : गेल्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईला सामोरे जात खडतर जीवन जगणाºया हंजगी ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या पाचविला पुजलेली आहे. या गावाला जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई भासत आहे. यामुळे येथून अनेक लोक पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत. एकूणच या भागातील तलाव, बोअर, विहीर आदी प्रकारचे स्रोत कोरडेठाक पडल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

एकेकाळी ऊसशेती, फळबाग व दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले हंजगी गाव़ बोअर, विहीर घेईल तिथे पाणी लागत होते. या माध्यमातून नावारूपाला आलेले हंजगी गाव सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. मागील ५-६ वर्षांपासून या गावाला दर जानेवारीपासून पाणीटंचाई भासत आहे. 

दरवर्षी ग्रामस्थांना याचे हाल सोसावे लागत आहेत. याबरोबरच तालुक्यातील हंजगी, जेऊर, हंद्राळ, हालचिंचोळी, वळसंग, बॅगेहळ्ळी, करजगी, मंगरुळ या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या भागात ५०० ते एक हजार फुटापर्यंत बोअरवेल घेऊन ही पाणी लागताना दिसत नाही. शासनाचे नियम धाब्यावर बसवून आज शेतकरी व नागरिक नवीन विहीर व बोअरवेल घेताना दिसतात. आज प्रत्येकाच्या शेतात दोन-दोन विहिरी व दोनपेक्षा अधिक बोअरवेल पाहायला मिळतात. यंदा मात्र या सर्व विहिरी व बोअरवेल कोरडे ठणठणीत पडले आहेत. यामुळेच या भागात सामान्य नागरिक, शेतकरी व जनावरे पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. उसाच्या पिकाला अधिक पाणी लागते़ ऊस शेतीतून अधिक उत्पादन मिळत असल्याने साहजिकच जास्तीत जास्त शेतकरी ऊस शेतीकडे वळले आहेत. अक्कलकोट तालुक्यात नेहमीच ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेले हंजगी गाव सध्या पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करताना दिसते. 

दुग्धव्यवसाय अडचणीत- एकेकाळी शेतीबरोबर दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हंजगी गावात हालहळ्ळी, कोन्हाळी अशा तीन-चार गावचे गवळी लोक दूध संकलन करून सोलापूर येथे छोट्या हत्तीच्या साह्याने घेऊन जात होते. आता याच गावात पाणी-चारा टंचाई निर्माण झाली आहे. म्हणून दूधव्यवसाय मोडकळीस        आलेला आहे. तसेच उसाचे क्षेत्र नेहमी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे एका शेतकºयाकडे तीन-तीन साखर कारखान्यांचे शेअर्स होते. तरीही कधी कधी अतिरिक्त ऊस होत होता. या शिवारातील १०० विहिरी, ५०० हून अधिक बोअर, तलाव आदी स्रोत कोरडेठाक पडल्याने या गावात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी होत आहे, अशी माहिती रशीद मुल्ला यांनी दिली़

टँकर सुरू, पण नियोजन नाही...- जानेवारीपासून हंजगी गावाला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी नियोजन नाही.            यामुळे ज्या ठिकाणी एनटीपीसी फताटेवाडी येथे रोज टँकर भरतो त्या       ठिकाणी कधी डिझेल नाही म्हणून तर कधी वीज नाही म्हणून ठरलेल्या तीन खेपा होत नाहीत. यामुळे ग्रामस्थांकडून ओरड होत असते. पाण्यासाठी  शाळकरी मुले, आबालवृद्ध नेहमी धडपडत असतात, अशी माहिती सरपंच     उमेश पाटील यांनी दिली.

साखर कारखानदारी वाढली..- गेल्या दहा ते पंधरा वर्षांखाली या भागात भरपूर ऊस होता. उसाचा पट्टा म्हणून  या गावाकडे पाहिले जायचे. म्हणूनच तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे लक्ष या गावावर होते. गाळप हंगाम संपेपर्यंत गावातील ऊस टोळ्या हलत नव्हत्या. कधी कधी अतिरिक्त उसाचा प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. या भागातील प्रत्येक शेतकरी पारंपरिक जुन्या पद्धतीने शेती करत असल्याने उसाच्या पिकासाठी भरपूर पाणी वाया जात असे. उसाच्या पिकाला पाणी कमी पडणार असे शेतकºयांना वाटले की, नवीन विहीर व बोअरवेल घ्यायला शेतकरी लगेच तयार व्हायचे. यामुळेच आज जमिनीतून पाण्याची  पातळी घटली आहे. या अतिरिक्त ऊस शेतीमुळेच आज या गावातील नागरिक व जनावरांनो पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जमिनीतून पाण्याची पातळी घटल्याने शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई