शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

या कारणामुळे केली खासगी रूग्णालयात अकौंटंटने मुलासह आत्महत्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:42 IST

सोलापुरातील घटना; अन् प्रेत सापडले कर्नाटक राज्याच्या हद्दीत

ठळक मुद्दे धुळखेड ब्रिज येथील भीमा नदीच्या बंधाºयात समर्थ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलानागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीआत्महत्या केली खरी मात्र ती लहान मुलाला सोबत घेऊन का केली हाही मोठा प्रश्न

सोलापूर : ना कसला ताणतणाव, ना डोक्यावर कसलेच कर्ज... असे असतानाही नागराज कनाळे याने आत्महत्या करुन स्वत:बरोबरच मुलाचीही जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पेट्रोल आणतो म्हणून नागराज हा शुक्रवारी आपल्या घोंगडे वस्तीतील घराबाहेर पडला अन् त्याच्यासह मुलाचे प्रेत शनिवारी सकाळी झळकी (जि. विजयपूर, कर्नाटक) येथील भीमा नदीच्या बंधाºयातील पाण्यात तरंगत असताना आढळून आले होते. 

नागराज कनाळे हे एका खासगी रूग्णालयात अकौंटंट म्हणून कामाला होते. ते पत्नी व दोन मुलांसह घोंगडे वस्ती येथे राहत होते. नागराज कनाळे हे शांत स्वभावाचे होते. त्यांना ९ वर्षाची मुलगी असून, ती चौथीमध्ये शिकत आहे. समर्थ कनाळे हा ५ वर्षाचा होता. तो श्री दिगंबर जैन गुरूकुल बालक मंदिरात लहान गटात शिकत होता. सर्व काही व्यवस्थित होतं. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून नागराज कनाळे हे एकदम शांत झाले होते. ते जास्त कोणाला बोलत नव्हते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठले. अंघोळ झाल्यानंतर ते पेट्रोल भरण्यासाठी जातो असे म्हणून निघाले. सोबत मुलगा समर्थ याला घेतले. एक तास झाला... दोन तास झाले...दुपार झाली तरी नागराज कनाळे हे घरी आले नाहीत. दरम्यान पत्नी घराची स्वच्छता करीत असताना माळावर ठेवलेली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीत नागराज यांनी ‘मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले होते.

चिठ्ठी वाचून पत्नीने तत्काळ पती नागराज यांना फोन केला, मात्र तो बंद लागत होता. नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र काहीच पत्ता लागत नव्हता. पत्नीने सायंकाळी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठले व पती सकाळपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रार घेतली, शेवटचा कॉल तपासला असता, विजापूर रोडवर झाल्याचे समजले. मात्र शनिवारी सकाळी धुळखेड ब्रिज येथील भीमा नदीच्या बंधाºयात समर्थ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दुपारी १.३0 वाजण्याच्या सुमारास नागराज यांचा मृतदेह आढळून आला. 

नागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्या केली खरी मात्र ती लहान मुलाला सोबत घेऊन का केली हाही मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

सध्याच्या तपासात नागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल, त्यानंतर पोलीस तपास करतील. आम्हीही आमच्या परीने तपास करीत आहोत, सत्य बाहेर येईल. - शिवशंकर बोंदर, पोलीस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलीस ठाणे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसSuicideआत्महत्या