शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे केली खासगी रूग्णालयात अकौंटंटने मुलासह आत्महत्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:42 IST

सोलापुरातील घटना; अन् प्रेत सापडले कर्नाटक राज्याच्या हद्दीत

ठळक मुद्दे धुळखेड ब्रिज येथील भीमा नदीच्या बंधाºयात समर्थ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलानागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीआत्महत्या केली खरी मात्र ती लहान मुलाला सोबत घेऊन का केली हाही मोठा प्रश्न

सोलापूर : ना कसला ताणतणाव, ना डोक्यावर कसलेच कर्ज... असे असतानाही नागराज कनाळे याने आत्महत्या करुन स्वत:बरोबरच मुलाचीही जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पेट्रोल आणतो म्हणून नागराज हा शुक्रवारी आपल्या घोंगडे वस्तीतील घराबाहेर पडला अन् त्याच्यासह मुलाचे प्रेत शनिवारी सकाळी झळकी (जि. विजयपूर, कर्नाटक) येथील भीमा नदीच्या बंधाºयातील पाण्यात तरंगत असताना आढळून आले होते. 

नागराज कनाळे हे एका खासगी रूग्णालयात अकौंटंट म्हणून कामाला होते. ते पत्नी व दोन मुलांसह घोंगडे वस्ती येथे राहत होते. नागराज कनाळे हे शांत स्वभावाचे होते. त्यांना ९ वर्षाची मुलगी असून, ती चौथीमध्ये शिकत आहे. समर्थ कनाळे हा ५ वर्षाचा होता. तो श्री दिगंबर जैन गुरूकुल बालक मंदिरात लहान गटात शिकत होता. सर्व काही व्यवस्थित होतं. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून नागराज कनाळे हे एकदम शांत झाले होते. ते जास्त कोणाला बोलत नव्हते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठले. अंघोळ झाल्यानंतर ते पेट्रोल भरण्यासाठी जातो असे म्हणून निघाले. सोबत मुलगा समर्थ याला घेतले. एक तास झाला... दोन तास झाले...दुपार झाली तरी नागराज कनाळे हे घरी आले नाहीत. दरम्यान पत्नी घराची स्वच्छता करीत असताना माळावर ठेवलेली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीत नागराज यांनी ‘मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले होते.

चिठ्ठी वाचून पत्नीने तत्काळ पती नागराज यांना फोन केला, मात्र तो बंद लागत होता. नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र काहीच पत्ता लागत नव्हता. पत्नीने सायंकाळी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठले व पती सकाळपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रार घेतली, शेवटचा कॉल तपासला असता, विजापूर रोडवर झाल्याचे समजले. मात्र शनिवारी सकाळी धुळखेड ब्रिज येथील भीमा नदीच्या बंधाºयात समर्थ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दुपारी १.३0 वाजण्याच्या सुमारास नागराज यांचा मृतदेह आढळून आला. 

नागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्या केली खरी मात्र ती लहान मुलाला सोबत घेऊन का केली हाही मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

सध्याच्या तपासात नागराज कनाळे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल, त्यानंतर पोलीस तपास करतील. आम्हीही आमच्या परीने तपास करीत आहोत, सत्य बाहेर येईल. - शिवशंकर बोंदर, पोलीस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलीस ठाणे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसSuicideआत्महत्या