शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

मोरवंचीतील भेगाळलेल्या भुईत गावकरी शोधतात पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:36 IST

दुष्काळाची दाहकता ; गावतलाव आटला, टँकरच्या प्रस्तावातही अडथळे, शेती अन् दुधाचा व्यवसाय डबघाईला

ठळक मुद्देगावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली गावातल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीबरोबरच परिसरात ५० ते ६० विहिरी आहेत, वाड्या-वस्त्यांसह १६ हातपंप गावात आहेतहातपंपावर पाणी हापसायचे म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. अशी अवस्था गावात पाहायला मिळाली

अशोक कांबळे

मोहोळ : पुरातन काळात ‘मोरेश्वर’ नावाने प्रसिद्ध असणाºया गावच्या महादेव मंदिराच्या नावावरून ‘मोरवंची’ नाव पडलेले हे गाव तुळजापूरकडे जाणाºया रोडवर आहे. एकेकाळी मुबलक पाणी व चारा असणाºया गावाला दिवसेंदिवस कमी पडत चाललेला पाऊस, गावाच्या परिसरात कॅनॉलला नसलेला बंधारा, अशा परिस्थितीत गावालगतच असणाºया भल्यामोठ्या तळ्यातील पाण्यावर गावाची तहान भागायची. मात्र, यंदा त्या तळ्यातही पाण्याचा टिपूस नसल्याने तळ्यातील भुईसुद्धा भेगाळली. यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.

मोहोळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया मोरवंची गावाला भर उन्हात दुपारी बारा वाजता भेट दिली. त्यावेळी पाण्याचे भीषण वास्तव समोर आले. जेमतेम १६०० लोकसंख्या असणाºया मोरवंची गावचे ग्रामदैवत मारुती मंदिरातच सरपंच प्रकाश वाघमारे यांची भेट झाली. वयाच्या पासष्टीकडे झुकलेले सरपंच प्रकाश वाघमारे यांनी गावात फिरवून पाण्याच्या समस्या मांडल्या. गावात ४५० कुटुंबे. पारंपरिक शेतीचा उद्योग अडचणीत येऊ लागल्याने शेतीबरोबरच दुधाचा व्यवसायही गावात चालतो. जवळपास दोन हजार जनावरे गावात आहेत.

गावातल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीबरोबरच परिसरात ५० ते ६० विहिरी आहेत. वाड्या-वस्त्यांसह १६ हातपंप गावात आहेत. परंतु, दरवर्षी पाऊस कमी पडत चालल्याने शेतकºयांनी शेतासह वस्तीवरही बोअर पाडले. ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची विहीरही कोरडी ठणठणीत पडली. म्हणून ग्रामपंचायतीने गावात पाणी पुरवठ्यासाठी तीन बोअर घेतले. त्यातील दोन पाण्याअभावी बंद पडले. एकाच बोअरवर गावासह कुंभार वस्ती, लोकरे वस्ती, पाटील-माने वस्ती, झोपडपट्टी परिसरातील सरवळे वस्ती अशा वस्त्यांसह गावाला पाळीने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. आता ते बोअरसुद्धा उचक्या देऊ लागलंय. गावातल्या सगळ्याच हातपंपांनीही मान टाकलीय. एक-दोन हातपंप सुरू आहेत. परंतु, त्या हातपंपावर पाणी हापसायचे म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. अशी अवस्था गावात पाहायला मिळाली.

गावालगतच पाण्यासाठी असणाºया भल्यामोठ्या तलावाने यावर्षी तळ गाठला. मोरवंचीकरांपुढे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे १५ दिवसांपूर्वी टँकरसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.परंतु, प्रशासनाच्या जाचक अटींमुळे अडचणी येत असल्याचे सरपंच वाघमारे यांनी सांगितले.

सरपंचांनाही आणावे लागते सायकलवरून पाणी- गावभर फिरून समस्या दाखविल्यानंतर सरपंच प्रकाश वाघमारे यांनी मारुती मंदिराजवळ सोडून गडबडीत निरोप घेतला. दरम्यान, गावात फेरफटका मारून मोहोळच्या दिशेने परत येताना गावाच्या बाहेर एक किलोमीटर अंतरावर एका वस्तीवरुन भर उन्हात अंगात बनियान, डोक्याला टापरं बांधून सायकलवर दोन घागरी व कळशी घेऊन निघालेले पासष्टीकडे झुकलेले गृहस्थ दिसले. पुढे जाऊन पाहिले असता गावचे सरपंच प्रकाश वाघमारे हे सायकलवरुन भर उन्हात घरी पाणी घेऊन निघाले होते. 

चिंचोली काटी एमआयडीसीमध्ये काम करून घरी आल्यावर विश्रांती मिळत नाही. पाण्याचा प्रश्न घरात बसू देत नाही. पाण्यासाठी गावात व गावाबाहेर भटकंती करावी लागते. पाण्याच्या वैतागाने दोन महिन्यांपूर्वीच घरासमोरची जनावरे विकावी लागली.- सुभाष कुंभार, गावकरी

झोपडपट्टी परिसरातील सरवळे वस्तीवर सुमारे दीडशे घरे आहेत. गावातल्या बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे वस्तीवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पोरांना रात्रभर गाडीवरून पाणी आणावे लागते. प्रशासनाने तातडीने टँकरची व्यवस्था करावी.- अनिरुद्ध पवार

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळTemperatureतापमानwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक