शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सोलापूरला पुन्हा मागे नेऊ नका; कडक संचारबंदीला सोलापूरकरांचा कडाडून विरोध

By appasaheb.patil | Published: June 25, 2020 11:51 AM

‘लोकमत’समोर मांडल्या शहरवासियांनी भावना; शिस्त पाळू, नियमांचे पालन करण्याची नागरिकांनी दिली हमी

ठळक मुद्देसोलापूरकरांनो शहाणे व्हा : अख्ख्या महाराष्ट्रात फक्त इथंच संचारबंदीची वेळ का येतेय ?एकीकडे देश अनलॉक होत असताना सोलापुरात मात्र पुन्हा थोडी नव्हे तर चक्क १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठविला सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ हे प्रशासन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत असल्यामुळे ‘पुनश्च स्टे होम’चा संदेश प्रशासनाच्या वतीने दिला

सोलापूर : अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता कुठे सोलापूर शहर पूर्वपदावर येत आहे़ त्यात पुन्हा कडक संचारबंदीची अंमलबजावणी करून सोलापूरकरांना वेठीस धरू नका़ कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा खीळ बसवू नका, सोलापूरला मागे नेऊ नका असे मत मांडतानाच शिस्त पाळू, नियमांचे पालन करू अशीही हमी सोलापुरातील नागरिकांनी लोकमत समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. तीन महिन्यांनंतर सुरू झालेले उद्योग-व्यापार रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय म्हणजे पुनश्च हरिओम.

शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता आणखी पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव आहे. दोन दिवस निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती, सोलापुरात १ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत विविध दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मात्र वाढत चालला आहे. त्यात नागरिक शिस्त व नियमांचे पालन करीत नसल्याचे सांगत प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे़ त्याबाबत गुरूवारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, त्यानंतर संचारबंदीबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सोलापूर शहरात पुन्हा कडक संचारबंदी करणे योग्य आहे का याबाबत उद्योजक राम रेड्डी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सोलापुरात पुन्हा कर्फ्यू लावला तर भूकमारी होईल. प्रशासनाला संचारबंदी लागू करायची असेल तर उद्योगधंदे सोडून करा, आता कुठे उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत, पुन्हा बंद केल्यास सोलापूर मागे जाईल. विनाकारण फिरणारे, नियमांचा भंग करणाºयांवर कारवाई करा, कंटेन्मेंट झोनवर प्रशासनाने अधिक लक्ष दिल्यास कोरोनाची रुग्णसंख्या नक्कीच थांबेल असेही त्यांनी सांगितले.

 प्रसिध्द वकील अ‍ॅड. धनंजय माने म्हणाले की, मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सोलापुरातही केवळ प्रतिबंधित क्षेत्र किंवा ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रभाव आहे अशा ठिकाणी संचारबंदी लागू करावी. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केल्यास सोलापूरची अर्थव्यवस्था पुन्हा कोसळणार आहे.

उद्योजक केतन शहा म्हणाले की, वास्तविक पाहता सोलापुरात पुन्हा संचारबंदीची गरज नाही. प्रशासन आपल्या चुका लपविण्यासाठी जनतेवर कर्फ्यू लादत आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या घडीला रुग्ण कमी आहेत. तुरळक ठिकाणे वगळता सर्वच ठिकाणी शासकीय नियमांचे पालन होतेय, पुन्हा बंद केल्यास सोलापूरची अवस्था दयनीय होईल, अर्थव्यवस्था पूर्ण ढासळेल.

शिक्षणतज्ञ प्रा़ शशिकांत कलबुर्गी म्हणाले सोलापूरला पुन्हा संचारबंदी लागू करण्याची गरज नाही. लोक नियम पाळतात की नाही, याबाबत शासनाने लक्ष द्यायला हवे. पुन्हा संचारबंदी लावल्यास सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. प्रशासनाने बंद न करता शासकीय नियमांची लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकांनीही मास्क, फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळायला हवेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका