शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

घटस्फोटितांना पुन्हा नव्यांशीच लग्न करायचंय; वधू-वर सूचक केंद्रांची माहिती; घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:40 IST

शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत. 

दीपक दुपारगुडे -सोलापूर : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात; पण त्या सुटायला किंवा तुटायला क्षुल्लक  कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय काही वर्षांत घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. या घटस्फोटितांना पुन्हा लग्न करायचं आहे, मात्र नव्यांशीच करायचे असल्याची बाब वधू-वर सूचक मंडळात नोंदलेल्या माहितीवरून पुढे आली आहे.

शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन् लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे वधू-वर सूचक केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढले आहेत. 

तरुण पिढीत समजून घेण्याची क्षमता कमी तरुण पिढीची समजून घेण्याची क्षमता कमी झाली आहे. दोघांचा इगो प्रॉब्लेम आणि दोघेही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने आता पुढे काय होईल, याची चिंताही नसल्यामुळे प्रमाण अधिक आहे.

अलीकडच्या काळात नवदाम्पत्यांमध्ये एक वेगळाच ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे. तो म्हणजे एक वर्षापर्यंत एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज घ्यावयाचा, नाही जमले तर विभक्त होऊन घटस्फोट घ्यायचा.- धनश्री स्वामी, चालक, वधू-वर सूचक केंद्र

घटस्फोटितांची अपेक्षा काय?वधू-वर सूचक केंद्र, ऑनलाइन मॅरेज ब्युरो यांच्या वेबसाइट आणि कार्यालयात नाव नोंदणी करण्यामध्ये नवीन स्थळ जुळविण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के आहे, तर घटस्फोटितांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

घटस्फोटामागची कारणं... -लॉकडाऊनमध्ये घाईगडबडीत लग्न, विनाविचारपूस, नोकरीची खात्री केली नाही, अशा कारणांनी घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक आहे. दाम्पत्यांमध्ये वाद, मोबाइल आणि सोशल मीडिया, सतत मोबाइल वापरणे, पतीकडून क्रूर वागणूक, तसेच जोडप्यांच्या वादात घरच्यांचा हस्तक्षेप, विशेषत: आई-वडिलांच्या हस्तक्षेपामुळे नवरा-बायकोचे नाते तुटल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :marriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार