शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना निधी वितरणाचाही दुष्काळ,  रब्बी हंगामातील मदतनिधीचे केवळ ३५ टक्के वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:56 PM

२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही.

ठळक मुद्दे राज्य शासनाने जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिलेमहसूल प्रशासनाने ५ लाखांहून अधिक शेतकºयांची यादी सरकारकडे सादर केलीपीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : २०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. १२ जानेवारीपर्यंत केवळ ३५ टक्के निधीचे वितरण झाले आहे. २०१५ हे वर्ष जिल्ह्यासाठी दुष्काळी ठरले. राज्य शासनाने जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिले. महसूल प्रशासनाने ५ लाखांहून अधिक शेतकºयांची यादी सरकारकडे सादर केली. परंतु ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने ४ लाख ५० हजार १९४ शेतकºयांची यादी सादर केली. या शेतकºयांसाठी ५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या निधीचे वितरण करायचे झाल्यास शेतकºयांच्या हातात ८० रुपये ते ५०० रुपये पडणार आहेत. याविरुध्द जिल्ह्यातील शेतकºयांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदतनिधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात वाढीव निधी दिलाच नाही. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांकडे रक्कम वर्ग करून शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात ३५ टक्के शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग झाला आहे. ही मदत अगदीच किरकोळ स्वरुपाची आहे. तरीही ती पोहोचण्यास उशीर लागत आहे. करमाळा तालुक्यात ९२ हजार ८७८ शेतकरी बाधित आहेत. येथील तहसीलदारांनी निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग केला आहे.---------------उत्तर सोलापूर तहसील सर्वात मागे- उत्तर सोलापूर तालुक्यात १६ हजार ४४६ शेतकरी बाधित ठरले आहेत. यापैकी केवळ २७२ शेतकºयांच्या खात्यावर निधी वितरित झाला आहे. उत्तर तहसीलने केवळ १ टक्का काम केले आहे. दक्षिण सोलापूर तहसीलने केवळ १६ टक्के काम केले आहे. या तालुक्यातील २६ हजार ७३६ शेतकरी बाधित ठरले आहेत. यापैकी ७ हजार ४८२ शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत. हे दोन्ही तालुके सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रभावाखाली आहेत. तरीही प्रशासन या तालुक्याविषयी किती गांभीर्याने काम करते हे दिसत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय