शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

व्यापाऱ्यांशी थेट संपर्क अन्‌ किसान रेल्वे मदतीनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:19 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नासीर कबीर करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नासीर कबीर

करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती माध्यमातून घेतलेल्या फळाचे किसान रेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत बोलबाला वाढला आहे. थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यामुळे शेतकऱ्यांना भावही चांगला मिळू लागला आहे.

करमाळा तालुक्यात शेटफळ येथील तरुण शेतकरी पाच वर्षांपासून केळी व पेरुचे फळ पीक घेत आहे. निर्यातक्षम केळी बरोबरच प्रायोगिक तत्त्वावर प्रगतिशील शेतकरी विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एन. आर. जातींच्या पेरूची लागवड केली आहे.

गट शेतीच्या माध्यमातून येथील विजय लबडे, नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर यांनी शेतात सुरुवातीला व्ही. एन. आर. पेरुची लागवड केली.

पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट पेरु शेती करणाऱ्यांना त्यांच्या शेतीला भेटी देऊन या पिकातील बारकावे समजून घेतले.

एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन घेतले. परंतू पुणे, मुंबई, हैदराबाद या बाजारपेठेत चांगला दर मिळत नव्हता. किसानरेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत २५ तासांच्या कालावधीत माल पोहोचू लागला. मालाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळू लागला. पेरुचे उत्तम प्रकारे ग्रेडिंग पॅकिंग व दहा किलो वजनाच्या बॉक्स मध्ये शेतकरी दिल्ली बाजारपेठेत माल पाठवला जात आहे. दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. रेल्वे विभागाकडून किसान रेल्वे सुविधा सुरू झाल्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत झाली आहे.

----

गटशेतीच्या माध्यमातून पेरु पीक निवडले. भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. परंतू सुरुवातीला बाजारपेठेची अडचण होती. किसान रेल्वे सुविधेमुळे ती दूर झाली आहे. शेटफळ परिसरातील शेतकऱ्यांचा माल जेऊर येथून पाठविला जात होता. परंतु रेल्वेने जेऊर येथील लोडिंग बंद केल्यामुळे कुर्डुवाडी येथे माल घेऊन जावा लागत आहे. जेऊर येथील सुविधा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.

- विजय लबडे

पेरू उत्पादक,

शेटफळ, ता.करमाळा

---

थेट दिल्ली बाजारपेठ

कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कंदर येथील किरण डोके यांच्या सहकार्याने दिल्ली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क झाला. माल थेट पाठविणे शक्य झाले. यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर मिळाला आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ३० एकर क्षेत्रावर हे फळपीक घेतले आहे. किसान रेल्वे सुविधेमुळे थेट दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

----

फोटो : २३ करमाळा