शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

विठ्ठलाच्या भेटीसाठी पावसातही चिंब भिजत पंढरी गाठणारी सायकल दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:54 IST

यंदाचे एकविसावे वर्ष : ओंकारेश्वर ते पंढरपूर ७५० किलोमीटरचा प्रवास

ठळक मुद्दे१९९२ साली अवघ्या दोघांनी सुरू केलेली ही वारी आज अकरा जणांची सर्वजण पन्नाशीच्या पुढचे आहेत.गावकरी आर्थिक मदत करतातयंदाच्या प्रवासात चार मोठे तर पाच ते सहा हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत आतापर्यंत प्रवास केल्याचे सहभागी दिंडीकºयांनी यांनी सांगितले

यशवंत सादूल 

पंढरपूर  : विठ्ठलाच्या भक्तिरसासोबत अधूनमधून पडणाºया पावसात चिंब भिजत सायकलवरून प्रवास करणारे वारकरी. सातशे ते साडेसातशे किलोमीटरचा रस्ता पार करीत दर आषाढीला पंढरी गाठतात. पन्नाशी आणि त्यापुढील वयाचे हे सर्व विठ्ठलभक्त असून, ते खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर या छोट्याशा खेड्यातील आहेत. यंदा त्यांचे एकविसावे वर्ष आहे. पंढरीच्या वाटेवर असलेल्या या सायकल दिंडीची भेट मोहोळ ते पंढरपूर मार्गावरील सारोळे गावानजीक झाली.

सायकलला बांधलेल्या छोट्याशा लाऊडस्पीकरवरून माझे माहेर पंढरी... सावळ्या विठ्ठला़़़ यासारखी भाव आणि भक्तिगीते वाजवित रांगेने येणारे अनोखे वारकरी. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर ते पंढरपूर जवळपास साडेसातशे किलोमीटर अंतर पार करीत दरवर्षी आषाढीला पंढरीला येणारे हे वारकरी. मागील एकवीस वर्षांपासून त्यांची ही सायकल दिंडी अखंडपणे चालू आहे. या दिंडीतील सर्व वारकरी हे पन्नास व त्यापुढील वयोगटाचे असून, त्यांचा उत्साह मात्र तरुणांसारखा आहे. त्यातील बहुतेक जण शेतकरी, शेतमजूर आहेत तर काही भेळ, चणेफुटाणे विके्रते आहेत. पासष्ट वर्षांचे दशरथ महाराज भोईराज हे दिंडीचे प्रमुख असून, सर्वात पुढे सायकलवर होते. त्यांच्यासोबत संजय महाजन, आबेद भोई, कैलास भोई, गोविंद भोई, सुनील महाजन, काळू भैरी, अनिल जंजाळकर, प्रभाकर पाटील, गोकुळ राजपूत हे सदस्य होते.

ओंकारेश्वर येथून २६ जून रोजी ही सायकल दिंडी निघाली. पुढे रावेर ते जामनेर, भोकरदन, कपिलधार, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर, सुरतगाव फाटा, मोहोळमार्गे सातशे पन्नास किलोमीटरचा सायकल प्रवास अकरा दिवसांमध्ये पूर्ण करून पंढरीत पोहचत आहे. यामध्ये नऊ ठिकाणी मुक्काम केला आहे. दररोज सरासरी ७५ ते ८० किलोमीटर अंतर कापले जाते. पहाटे सहा वाजता निघाले की ४० किलोमीटर अंतरावरील गावात जेवण व विश्रांतीसाठी थांबले जाते. सायंकाळच्या सत्रात पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर कापले जाते. रात्रीचा मुक्काम त्या गावातील मंदिरात केले जाते. सायकलचालक हे पंक्चर व इतर रिपेअरी स्वत: करतात़ सर्व साहित्य सोबतच असते. पंढरपूरला सद्गुरू दिगंबर मठात त्यांचा मुक्काम असतो. एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माघारी फिरतात. त्यांचा परतीच्या प्रवासाचा मार्ग मात्र दुसराच आहे. पंढरपूरहून टेंभुर्गी, करमाळा मार्गे नगरला जातात. शनिशिंगणापूर, शिर्डीचे दर्शन घेऊन कोपरगाव, चाळीसगावमार्गे जळगाव आणि ओंकारेश्वरला जातात. 

 पाऊस आला तरी थांबणे नाही...- एका मुक्कामाच्या ठिकाणाहून सायकलवर स्वार झाल्यावर कितीही जोराचा पाऊस आला तरी दिंडीतील एकही जण थांबत नाही. पावसात चिंब भिजत विठुनामाचा जयघोष करीत आलेल्या पावसाचे स्वागत करीत दिंडी पुढेच सरकते. मुक्कामाच्या ठिकाणीच थांबते. यावेळी अंगात वेगळीच ऊर्जा संचारते असा त्यांचा अनुभव आहे. यंदाच्या प्रवासात चार मोठे तर पाच ते सहा हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत आतापर्यंत प्रवास केल्याचे सहभागी दिंडीकºयांनी यांनी सांगितले. 

१९९२ साली अवघ्या दोघांनी सुरू केलेली ही वारी आज अकरा जणांची आहे. सर्वजण पन्नाशीच्या पुढचे आहेत.गावकरी आर्थिक मदत करतात.इच्छुकांची संख्या वाढली असली तरी आम्ही मर्यादा ठरविली आहे. दरवर्षीची ही आमची आनंद वारी असून, अमर्याद आनंद मिळतो. -दशरथ महाराज भोईराज, सायकल दिंडीप्रमुख, रावेर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाJalgaonजळगाव