शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

परराज्यातील कामगारांची मेहनती वृत्ती; बारा तासही काम करण्याची असते तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:14 IST

सोलापुरातील चिंचोली औद्योगिक वसाहत; कुरकुर न करता मिळेल ते काम करण्यास सज्ज

ठळक मुद्देउत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या ३५ ते ४० हजार कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करतातपश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्याही दखल घेण्याजोगी आहेसध्या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत असेल असे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले

अरुण बारसकर 

सोलापूर :  हाताला पडेल ते काम करण्याची असलेली तयारी, १२ तास काम करण्यासाठी नसलेली कुरकुर व कामातील प्रामाणिकता यामुळे चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगारांच्या नियुक्तीचे प्रमाण वाढले आहे. सध्या ८ ते १० हजार परराज्यातील कामगार या एमआयडीसीमध्ये कार्यरत आहे. अखंडपणे महिनाभर हे बाहेरच्या राज्यातील कामगार कामावर येतात, असे चिंचोली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या ३५ ते ४० हजार कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करतात. यामध्ये पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. सध्या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत असेल असे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले. चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्या चालकांचा बाहेरच्या राज्यातील कामगाराबाबतचा अनुभव चांगला आहे. हाताला मिळेल ते काम आनंदाने करणे, स्थानिक कामगारांसोबत आठ तास काम केल्यानंतर वाढीव चार तास काम करण्यासाठी कसलीही कुरकुर नसणे, शिवाय कामातील प्रामाणिकपणाही बाहेरच्या राज्यातील कामगारांमध्ये दिसून येतो. म्हणूनच अनेक वर्षांपासून बाहेरच्या राज्यातील कामगार टिकून आहेत

अवघे १५ कामगार मिळाले: केशव रेड्डी- सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष केशव रेड्डी वस्तुस्थितीचे एक उदाहरण सांगितले. औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला ५० कामगारांची गरज होती. कंपनीला जवळपासच्या गावातून अवघे १५ कामगार मिळाले. कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी पुरेसे कामगार नसल्याने कंपनीला परप्रांतीय कामगार शोधावे लागल्याचे अध्यक्ष रेड्डी यांनी सांगितले. 

उत्तरप्रदेश, बिहारच्या कामगारांची संख्या वरचेवर कमी होतेय. पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशचे लोक कामासाठी मिळतात. बºयाचशा मोठ्या कंपन्यात स्थानिक कामगारच काम करतात. मध्यम व लहान कंपन्यात बाहेरच्या राज्यातील कामगार आहेत.- केशव रेड्डीअध्यक्ष,सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन

एकदा कंपनीला कामगार जोडून दिले की डोकेदुखी राहत नाही.आठवड्याला खर्चासाठी उचल घेतात व महिन्याला पगार दिला जातो. किमान वेतन दिले जाते. सध्या पश्चिम बंगालचे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत तर त्यानंतर मध्यप्रदेशचे.-किरण मानेठेकेदार, मजूर पुरवठादार

दोन महिने सुट्टीवर..- मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील तरुण मुले ही वर्षातून दोनवेळा व दोन महिने सुट्टी घेऊन गावी जातात. १० महिने ते आठवड्याची सुट्टी वगळता नियमित कामावर येतात. काही कामगार तर सुट्टी दिवशीही कामावर येतात. त्यामुळे कंपन्यांना उत्पादनासाठी अडचण येत नाही. बाहेरच्या राज्यातील काही कामगार आता सहकुटुंबही येत असल्याने अशांची  राहण्याची सोय कंपनीच्या आवारातच केली जाते. त्यामुळे वेळेवर व निश्चित कामावर येतात. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय