शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वेगळी बातमी; बिनधास्त झोपा; रेल्वे जागवेल ! रेल्वेची ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा

By appasaheb.patil | Updated: October 23, 2022 15:06 IST

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये सुविधा; रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना दिलासा

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : प्रवाशांनी आता रेल्वेमध्ये आरामात झोप घेतली तरी चालणार आहे. कारण, झोपलेल्या प्रवाशांना त्यांचे इच्छित स्टेशन आल्यानंतर जागं करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. रेल्वे स्टेशन येण्याच्या २० मिनिटे आधी ‘वेकअप अलार्म’ पाठवून प्रवाशांना जागं केलं जाणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा अधिक फायदा होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अनेकदा प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांचे इच्छित स्टेशन मागे सुटून जाते व नंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सुविधा सुरू केली आहे. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या सुविधेसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. यासाठी रेल्वे प्रवाशांकडून फक्त तीन रुपये आकारले जाणार आहेत.

-------------

कशा प्रकारे काम करतो वेकअप अलार्म

रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर वेक-अप अलार्म पाठविला जाईल. हा अलार्म ट्रेन स्टेशनवर येण्याच्या २० मिनिटे आधी दिला जाईल. जेणेकरून प्रवासी झोपेतून जागे होतील आणि रेल्वेतून खाली उतरण्याची तयारी करतील.

-----------

असा घ्या सुविधेचा लाभ

रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणारा कोणताही प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी त्याला त्याच्या मोबाईलवरून १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागेल. कॉल केल्यानंतर प्रवाशाला भाषा निवडण्यासाठी पर्याय दिला जाईल. यानंतर, वेकअप डेस्टिनेशन अलर्टसाठी सात आणि नंतर दोन हे आकडे दाबावे लागतील. नंतर प्रवाशाला त्याचा १० अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. पीएनआर क्रमांक भरल्यानंतर एक अंक दाबून त्याची पुष्टी करावी लागेल. हे केल्यानंतर प्रवाशाचे इच्छित स्टेशन सेट केले जाईल आणि ते स्थानक येण्याच्या २० मिनिटांपूर्वी त्याला अलर्ट मिळेल. तुम्ही जर रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

------------

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती

आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दररोज शेकडो गाड्या ये-जा करतात. दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते.

----------

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे