शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

केलं पब्लिकचं गं वाटुळं बया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 5:04 PM

आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय

-  समीर इनामदार

निवडणुका आल्या की, अनेकांना जोश येतो. गेल्या पाच वर्षांपासून साठविलेला उत्साह आता एकदमच सांडतो की काय, अशी स्थिती काही जणांची झालेली असते. गल्लीबोळातली बित्तंबातमी आपल्यालाच कशी आहे आणि ती कधी एकदा लोकांना सांगतो, असं अनेक जणांना झालेलं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिऊन थेट काही जण तालुक्याच्या ठिकाणी तर काही जण निवडणूक कार्यालयात पोहोचतात. नवीन काय खबर... काय म्हणतंय वातावरण हेच आता सगळीकडे ऐकू यायला लागतं. चहाच्या टपरीवर, पारावर आणि बसमध्ये याशिवाय दुसरी चर्चाच नाही. आता शहर आणि जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेला असल्याने पावसाने होणाºया काळजीची चर्चा जरा कमी झालीय.

आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय. हलगी गरम झाल्याशिवाय वाजत नाही, तशी चर्चांची हलगी हळूहळू गरम व्हायला लागलीय. मात्र अजून हवा तसा ‘जाळ’ लागला नाही. त्यामुळे अनेकांना असा ‘जाळ’ लावायची हौस असते. त्यामागचे त्यांचे कारण म्हणजे त्यांचे दुकान चालू शकत नाही. समोरचा एका पार्टीचा आहे म्हटलं की त्याच्याविरुद्ध बोलायचे आणि त्याला रागाला आणून त्याच्याकडून आपल्याला हवं ते काढून घ्यायची काही जणांची  पद्धतच असते. ‘लावा शर्यत’ हे वाक्य तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळणार. काहीही झालं तरी ‘लावा शर्यत’ अशी काहींची दिवसभराची दिनचर्याच असते. हा कसा या उमेदवाराच्या विरुद्ध आहे, तो कसा शेवटी पलटी मारणार किंवा ठराविक भागाची  मोळी कशी बांधायची यात तो कसा हुशार आहे, असं आपल्या नेत्याचं कौतुक करण्यात अशी मंडळी दिवसभर कामाला लागलेली असतात.

फेसबूक किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमात हल्ली आपल्याला ट्रोलिंगची स्थिती दिसते. मात्र असं ट्रोलिंग करण्यात काही जण वर्षानुवर्षे माहीर असतात. अशा बिनकामाच्या पण कामाला येणाºया मंडळींना काही नेतेमंडळी हाताशी धरून असतात. ‘गटारीचं पाणीही कधी कधी आग विझवायला कामी येतं’ असं म्हणत अशा लोकांना आपल्या पदरी ठेवण्याचं कौशल्य नेतेमंडळींमध्ये असते. अशी ही मंडळी मग निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र आपल्या विरुद्धचा उमेदवार ‘न्हेलं साठवलेलं गं गाठोडं बया, केलं पब्लिकचं गं वाटुळं बया’ अशी गाणं म्हणत असतात. सगळ्याच नेत्यांकडे अशी माणसं असतात. मग दबलेली, पिचलेली मतदार मंडळी अशा नेत्यांना विरोध न करता ‘अगदी ढिम्म चेहरा करून तुम्ही सांगताय तेच कसं खरं हाय आणि आम्हाला हे माहिती नव्हतं बुवा’ अशा पद्धतीने ऐकत असतात. ‘असं व्हय’ म्हटलं की मग अशा निवडणुकीपुरत्या ‘व्हाईट कॉलर’ नेत्यांना अंगावर मूठभर मांस चढतं. मग २१ तारखेला बघाच किंवा २४ ला गुलाल आपलाच असं सांगत असताना जणू मतदार हा ‘उरलो आता बटन दाबण्यापुरता’ अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहत असतो.काही जण तर निवडणुकीनंतर आपण सांगितलेलं कसं खरं ठरलं हे सांगताना पूर्वी आपण काय  बोललो हे सोयीस्करपणे विसरून जातात आणि आपल्या सांगण्याचा फायदा त्या विजयी उमेदवाराला कसा झाला याची कहाणी अगदी तिखट, मीठ लावून सांगत असतात. त्यामुळे येणारे दिवस अशा बडबोल्या नेत्यांचे असणार आहेत. त्यामुळे जागल्या मतदारांना अशा अचानक उगवलेल्या नेत्यांपासून सावध रहावे लागणार आहे. अर्थात काहींना त्यांच्याकडून मनोरंजनही होईल आणि त्यांचा दिवसही मजेत जाईल, हेही नसे थोडके.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण