शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केलं पब्लिकचं गं वाटुळं बया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:04 IST

आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय

-  समीर इनामदार

निवडणुका आल्या की, अनेकांना जोश येतो. गेल्या पाच वर्षांपासून साठविलेला उत्साह आता एकदमच सांडतो की काय, अशी स्थिती काही जणांची झालेली असते. गल्लीबोळातली बित्तंबातमी आपल्यालाच कशी आहे आणि ती कधी एकदा लोकांना सांगतो, असं अनेक जणांना झालेलं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिऊन थेट काही जण तालुक्याच्या ठिकाणी तर काही जण निवडणूक कार्यालयात पोहोचतात. नवीन काय खबर... काय म्हणतंय वातावरण हेच आता सगळीकडे ऐकू यायला लागतं. चहाच्या टपरीवर, पारावर आणि बसमध्ये याशिवाय दुसरी चर्चाच नाही. आता शहर आणि जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेला असल्याने पावसाने होणाºया काळजीची चर्चा जरा कमी झालीय.

आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय. हलगी गरम झाल्याशिवाय वाजत नाही, तशी चर्चांची हलगी हळूहळू गरम व्हायला लागलीय. मात्र अजून हवा तसा ‘जाळ’ लागला नाही. त्यामुळे अनेकांना असा ‘जाळ’ लावायची हौस असते. त्यामागचे त्यांचे कारण म्हणजे त्यांचे दुकान चालू शकत नाही. समोरचा एका पार्टीचा आहे म्हटलं की त्याच्याविरुद्ध बोलायचे आणि त्याला रागाला आणून त्याच्याकडून आपल्याला हवं ते काढून घ्यायची काही जणांची  पद्धतच असते. ‘लावा शर्यत’ हे वाक्य तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळणार. काहीही झालं तरी ‘लावा शर्यत’ अशी काहींची दिवसभराची दिनचर्याच असते. हा कसा या उमेदवाराच्या विरुद्ध आहे, तो कसा शेवटी पलटी मारणार किंवा ठराविक भागाची  मोळी कशी बांधायची यात तो कसा हुशार आहे, असं आपल्या नेत्याचं कौतुक करण्यात अशी मंडळी दिवसभर कामाला लागलेली असतात.

फेसबूक किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमात हल्ली आपल्याला ट्रोलिंगची स्थिती दिसते. मात्र असं ट्रोलिंग करण्यात काही जण वर्षानुवर्षे माहीर असतात. अशा बिनकामाच्या पण कामाला येणाºया मंडळींना काही नेतेमंडळी हाताशी धरून असतात. ‘गटारीचं पाणीही कधी कधी आग विझवायला कामी येतं’ असं म्हणत अशा लोकांना आपल्या पदरी ठेवण्याचं कौशल्य नेतेमंडळींमध्ये असते. अशी ही मंडळी मग निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र आपल्या विरुद्धचा उमेदवार ‘न्हेलं साठवलेलं गं गाठोडं बया, केलं पब्लिकचं गं वाटुळं बया’ अशी गाणं म्हणत असतात. सगळ्याच नेत्यांकडे अशी माणसं असतात. मग दबलेली, पिचलेली मतदार मंडळी अशा नेत्यांना विरोध न करता ‘अगदी ढिम्म चेहरा करून तुम्ही सांगताय तेच कसं खरं हाय आणि आम्हाला हे माहिती नव्हतं बुवा’ अशा पद्धतीने ऐकत असतात. ‘असं व्हय’ म्हटलं की मग अशा निवडणुकीपुरत्या ‘व्हाईट कॉलर’ नेत्यांना अंगावर मूठभर मांस चढतं. मग २१ तारखेला बघाच किंवा २४ ला गुलाल आपलाच असं सांगत असताना जणू मतदार हा ‘उरलो आता बटन दाबण्यापुरता’ अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहत असतो.काही जण तर निवडणुकीनंतर आपण सांगितलेलं कसं खरं ठरलं हे सांगताना पूर्वी आपण काय  बोललो हे सोयीस्करपणे विसरून जातात आणि आपल्या सांगण्याचा फायदा त्या विजयी उमेदवाराला कसा झाला याची कहाणी अगदी तिखट, मीठ लावून सांगत असतात. त्यामुळे येणारे दिवस अशा बडबोल्या नेत्यांचे असणार आहेत. त्यामुळे जागल्या मतदारांना अशा अचानक उगवलेल्या नेत्यांपासून सावध रहावे लागणार आहे. अर्थात काहींना त्यांच्याकडून मनोरंजनही होईल आणि त्यांचा दिवसही मजेत जाईल, हेही नसे थोडके.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण