शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

केलं पब्लिकचं गं वाटुळं बया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:04 IST

आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय

-  समीर इनामदार

निवडणुका आल्या की, अनेकांना जोश येतो. गेल्या पाच वर्षांपासून साठविलेला उत्साह आता एकदमच सांडतो की काय, अशी स्थिती काही जणांची झालेली असते. गल्लीबोळातली बित्तंबातमी आपल्यालाच कशी आहे आणि ती कधी एकदा लोकांना सांगतो, असं अनेक जणांना झालेलं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिऊन थेट काही जण तालुक्याच्या ठिकाणी तर काही जण निवडणूक कार्यालयात पोहोचतात. नवीन काय खबर... काय म्हणतंय वातावरण हेच आता सगळीकडे ऐकू यायला लागतं. चहाच्या टपरीवर, पारावर आणि बसमध्ये याशिवाय दुसरी चर्चाच नाही. आता शहर आणि जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेला असल्याने पावसाने होणाºया काळजीची चर्चा जरा कमी झालीय.

आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय. हलगी गरम झाल्याशिवाय वाजत नाही, तशी चर्चांची हलगी हळूहळू गरम व्हायला लागलीय. मात्र अजून हवा तसा ‘जाळ’ लागला नाही. त्यामुळे अनेकांना असा ‘जाळ’ लावायची हौस असते. त्यामागचे त्यांचे कारण म्हणजे त्यांचे दुकान चालू शकत नाही. समोरचा एका पार्टीचा आहे म्हटलं की त्याच्याविरुद्ध बोलायचे आणि त्याला रागाला आणून त्याच्याकडून आपल्याला हवं ते काढून घ्यायची काही जणांची  पद्धतच असते. ‘लावा शर्यत’ हे वाक्य तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळणार. काहीही झालं तरी ‘लावा शर्यत’ अशी काहींची दिवसभराची दिनचर्याच असते. हा कसा या उमेदवाराच्या विरुद्ध आहे, तो कसा शेवटी पलटी मारणार किंवा ठराविक भागाची  मोळी कशी बांधायची यात तो कसा हुशार आहे, असं आपल्या नेत्याचं कौतुक करण्यात अशी मंडळी दिवसभर कामाला लागलेली असतात.

फेसबूक किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमात हल्ली आपल्याला ट्रोलिंगची स्थिती दिसते. मात्र असं ट्रोलिंग करण्यात काही जण वर्षानुवर्षे माहीर असतात. अशा बिनकामाच्या पण कामाला येणाºया मंडळींना काही नेतेमंडळी हाताशी धरून असतात. ‘गटारीचं पाणीही कधी कधी आग विझवायला कामी येतं’ असं म्हणत अशा लोकांना आपल्या पदरी ठेवण्याचं कौशल्य नेतेमंडळींमध्ये असते. अशी ही मंडळी मग निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र आपल्या विरुद्धचा उमेदवार ‘न्हेलं साठवलेलं गं गाठोडं बया, केलं पब्लिकचं गं वाटुळं बया’ अशी गाणं म्हणत असतात. सगळ्याच नेत्यांकडे अशी माणसं असतात. मग दबलेली, पिचलेली मतदार मंडळी अशा नेत्यांना विरोध न करता ‘अगदी ढिम्म चेहरा करून तुम्ही सांगताय तेच कसं खरं हाय आणि आम्हाला हे माहिती नव्हतं बुवा’ अशा पद्धतीने ऐकत असतात. ‘असं व्हय’ म्हटलं की मग अशा निवडणुकीपुरत्या ‘व्हाईट कॉलर’ नेत्यांना अंगावर मूठभर मांस चढतं. मग २१ तारखेला बघाच किंवा २४ ला गुलाल आपलाच असं सांगत असताना जणू मतदार हा ‘उरलो आता बटन दाबण्यापुरता’ अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहत असतो.काही जण तर निवडणुकीनंतर आपण सांगितलेलं कसं खरं ठरलं हे सांगताना पूर्वी आपण काय  बोललो हे सोयीस्करपणे विसरून जातात आणि आपल्या सांगण्याचा फायदा त्या विजयी उमेदवाराला कसा झाला याची कहाणी अगदी तिखट, मीठ लावून सांगत असतात. त्यामुळे येणारे दिवस अशा बडबोल्या नेत्यांचे असणार आहेत. त्यामुळे जागल्या मतदारांना अशा अचानक उगवलेल्या नेत्यांपासून सावध रहावे लागणार आहे. अर्थात काहींना त्यांच्याकडून मनोरंजनही होईल आणि त्यांचा दिवसही मजेत जाईल, हेही नसे थोडके.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण