शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:19 IST

कोरोनामुळे परंपरा खंडित: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा  

ठळक मुद्देपरंपरेनुसार वाटचालीत प्रवासात लाखो वारकºयांना मनमुराद आनंद लुटण्यासाठी रिंगण सोहळा घेतला जातोपालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्यात उभे रिंगण व गोल रिंगण असे दोन प्रकार असतातरिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी व सर्व पालख्या, दिंड्या एकत्र येतात

श्रीपूर : टाळ मृदंगाचा गजर, माऊली.., माऊली.., नामाचा अखंड जयघोष करीत माळशिरस तालुक्यातील श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सर्वात मोठ्या उभ्या व गोल रिंगणात अश्व नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. यंदा मात्र हा नयनरम्य सोहळा कोरोनाच्या संकटामुळे होणार नसल्याने लाखो भाविकांना रिंगण सोहळा पाहण्यास मुकावे लागणार असल्याचे शरद पोळ, शहाजी मांडवे, विजयकुमार शेळके, बळीराम पोखरे आदी भाविकांनी सांगितले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदा आषाढी एकादशीची वारी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका वाहनाने पंढरपूरला नेल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी ३३५ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला.जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज येथे गोल रिंगणाचा नयनरम्य सोहळा पार पडतो. तो सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक एकत्र येतात. आसमंत व्यापून टाकणारा टाळ मृदंगाचा गजर..., माऊली..., माऊली..., नामाचा अखंड जयघोष करीत सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाºया उभ्या व गोल रिंगणात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडतात.

श्रीसंत तुकाराम महाराज यांच्यासह भागवत धर्माची पताका उंचावत सुमारे लाखो वैष्णवांसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले संतांचे पालखी सोहळे या रिंगण सोहळ्यासाठी अकलूजमध्ये दाखल झालेले शेकडो भाविक नयनरम्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी अकलूज येथे पोहोचतात. अवघी अकलूजनगरी विठुनामासह माऊली..., माऊली...च्या जयघोषाने दुमदुमून जाते. दुसºया दिवशी माळीनगर येथे पहिला उभा रिंगण सोहळा पार पडतो.

आषाढी वारीची परंपरा खंडित नाही- स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेग साथीमुळे तसेच अन्य कारणांमुळे आषाढी वारीच्या परंपरेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पायी वारी खंडित झाल्याची नेमकी नोंद नसली तरी एक-दोनदा ही परिस्थिती निर्माण झाली होती. असे संदर्भ असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा पायी वारी जाणार नसली तरी पादुका नेल्या जाणार आहेत. त्यामुळे वारीची परंपरा खंडित होणार नाही, असे देहू संस्थानचे माजी अध्यक्ष बापू महाराज मोरे-देहूकर यांनी सांगितले.

वेळ, ठिकाण नियोजन असते निश्चित- पालखी सोहळ्यातील विशेष आकर्षण रिंगण सोहळा असतो. परंपरेनुसार वाटचालीत प्रवासात लाखो वारकºयांना मनमुराद आनंद लुटण्यासाठी रिंगण सोहळा घेतला जातो. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्यात उभे रिंगण व गोल रिंगण असे दोन प्रकार असतात. रिंगण सोहळ्याचे वेळापत्रक, ठिकाण, वेळ सर्व निश्चित व नियोजित असते. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी व सर्व पालख्या, दिंड्या एकत्र येतात. ठरलेल्या वेळेनुसार व क्रमाने दिंड्या चालत असतात.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा