शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Devendra Fadanvis: आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 10:52 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली.

पंढरपूर/सोलापूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी अन् कार्तिकी एकादशीची पूजा करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मानही मिळाला आहे.  

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. आषाढी यात्रेच्या एकादशी सोहळ्याच्या दिवशी शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी यात्रेची एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांना प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. राज्यात ४ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले अन् विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे अनपेक्षितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. यापूर्वी, २०१४ ते १९ या काळात त्यांनी ५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री बनून काम पाहिले. त्यामुळे, साहजिक मुख्यमंत्री असल्याने आषाढी एकादशीचा बहुमान त्यांना मिळत असे. तर, कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते होते. त्यामुळे, यंदा उपमुख्यमंत्री असल्याने हाही मान त्यांना मिळाला. त्यामुळेच, आषाढी अन् कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मान मिळालेले ते एकमेव उपमुख्यमंत्री ठरले आहेत. हा विलक्षण योग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी बोलून दाखवलं. 

तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम होईल

अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर