शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Devendra Fadanvis: आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 10:52 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली.

पंढरपूर/सोलापूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी अन् कार्तिकी एकादशीची पूजा करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मानही मिळाला आहे.  

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. आषाढी यात्रेच्या एकादशी सोहळ्याच्या दिवशी शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी यात्रेची एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांना प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. राज्यात ४ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले अन् विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे अनपेक्षितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. यापूर्वी, २०१४ ते १९ या काळात त्यांनी ५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री बनून काम पाहिले. त्यामुळे, साहजिक मुख्यमंत्री असल्याने आषाढी एकादशीचा बहुमान त्यांना मिळत असे. तर, कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते होते. त्यामुळे, यंदा उपमुख्यमंत्री असल्याने हाही मान त्यांना मिळाला. त्यामुळेच, आषाढी अन् कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मान मिळालेले ते एकमेव उपमुख्यमंत्री ठरले आहेत. हा विलक्षण योग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी बोलून दाखवलं. 

तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम होईल

अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर