शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 10:52 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली.

पंढरपूर/सोलापूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी अन् कार्तिकी एकादशीची पूजा करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मानही मिळाला आहे.  

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. आषाढी यात्रेच्या एकादशी सोहळ्याच्या दिवशी शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी यात्रेची एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस यांना प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. राज्यात ४ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले अन् विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे अनपेक्षितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. यापूर्वी, २०१४ ते १९ या काळात त्यांनी ५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री बनून काम पाहिले. त्यामुळे, साहजिक मुख्यमंत्री असल्याने आषाढी एकादशीचा बहुमान त्यांना मिळत असे. तर, कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते होते. त्यामुळे, यंदा उपमुख्यमंत्री असल्याने हाही मान त्यांना मिळाला. त्यामुळेच, आषाढी अन् कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मान मिळालेले ते एकमेव उपमुख्यमंत्री ठरले आहेत. हा विलक्षण योग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी बोलून दाखवलं. 

तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम होईल

अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर