शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सोलापुरात वाहनांची विक्री कमी तरीही आरटीओला मिळाले ज्यादा उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:13 IST

किंमती वाढल्याचा परिणाम; दसरा, दिवाळीत वाहनांच्या विक्रीत किंचित वाढ

सोलापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दसरा व दिवाळीत वाहनांची विक्री कमी होऊनही किमती वाढल्याने आरटीओकडील महसूल वाढल्याचे दिसून येत आहे.

या वर्षीच्या आर्थिक वर्षात कोरोना साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने वाहन उद्योगावर परिणाम झाला. गुढीपाडव्याला वाहनांची विक्रीच झाली नाही. त्यानंतर साथीचा जोर ओसरल्यावर लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यावर हळूहळू बाजार पूर्वपदावर आला. अशाही स्थितीत यंदा दसरा आणि दिवाळीत वाहन बाजार त्या मानाने तेजीत राहिला. मात्र गतवर्षीइतकी दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री झाली नाही. तरीही वाहन विक्रीतून आरटीओकडे गतवर्षीपेक्षा जादा महसूल जमा झाला.

आरटीओकडे वाहन विक्रीतून जादा महसूल जमा होण्याचे कारण म्हणजे प्रदूषण नियमांमुळे वाहनांमध्ये करण्यात आलेला बदल. एप्रिल २०२० नंतर प्रदूषणांचे मानांकन बीएस: ४ प्रकारच्या वाहनांची नोंदणी बंद करण्यात आली. आता बीएस:५ मानांकनाची वाहने बाजारात आली आहेत. या बदलामुळे वाहनांच्या बनावटीत बदल करण्यात आल्याने किमती वाढल्या आहेत. वाहनांच्या किमती वाढल्याने त्या प्रमाणात आरटीओचे शुल्कही वाढले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरच्या उलाढालीतून आरटीओला महसूल जादा मिळाल्याचे दिसून येत आहे.

अशी झाली उलाढाल

सन २०१९ विक्री

सर्व दुचाकी: ७६४२

मोटरकार: ६३३

मालवाहू वाहन: ४५७

वाहन कर: १९ कोटी २२९ लाख

 

सन २०२० विक्री

सर्व दुचाकी: ६०४८

मोटरकार: ८१२

मालवाहू वाहन: ३७१

वाहन कर: २१ कोटी ५ लाख

 

कोरोना साथीमुळे यंदा १ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या सणांच्या काळात वाहनांची विक्री कमी झाली तरी प्रदूषण मानांकनात बदल झाल्याने वाहनांच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे वाहन करात वाढ दिसून येत आहे.

- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसroad transportरस्ते वाहतूक