शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

'EWS रद्द करण्याची मागणी मराठ्यांची नाही,आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर सरकार जाणार'; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:07 IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. आज मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत, जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढणार आहेत. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 'तिनही बाजूंनी यांनी मराठ्यांचं वाटुळं केलं आहे. तुम्ही दहा टक्के आरक्षण देऊन आमचं वाटूळं केलं. EWS रद्द करुनही मराठ्यांचं वाटुळ केलं आहे', असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केला.

RBI Monetary Policy : वाढत्या महागाईदरम्यान सामान्यांना दिलासा नाहीच, EMI चा भार कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले, दोन दिवसापूर्वी आंबेडकर यांनी सगेसोयऱ्याची व्याख्या आणि मागणी आम्हाला मान्य नाही असं सांगितलं होतं. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ते आता सत्तेत कुठे आहेत. त्यांना मान्य आहे की नाही यापेक्षा आम्हाला सरकारने आश्वासन दिले आहे हे महत्वाच आहे. आश्वासन पूर्ण केलं नाहीतर सरकार जाणार, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. सरकार फक्त भुजबळ यांचे ऐकत आहे, त्यांना बळ देण्याचं काम फडणवीस करत आहेत. त्यांना आता भोगाव लागणार आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. यो लोकांमुळे राज्यातील भाजप संपवणार आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. 

"आम्हा गरीब मराठ्यांना आरक्षण हवं हेच फक्त दिसत आहे. आम्ही जातीसाठी भिजत आहे. तुम्हीच आरक्षण दिलं म्हणून मराठ्यांनी परत तुम्हाला आणलं, आता परत नाही दिलं तर परत घालवणार. हे सरकार विचित्र आहे. हे आधी देतात आणि परत घेतात. एका बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने वाटुळं करायचं. नोंदी शोधल्या पण प्रमाणपत्र देण्यासाठी कक्षच नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

EWS रद्द करण्याची मागणी नव्हती

"हे लोक जाणून बुजून घात करत आहेत, १० टक्के मागितलं नाही तरीही कायदा पारित केला आणि EWS रद्द केलं. EWS रद्द करण्याची मागणी मराठ्यांची नव्हती. आता त्याचाही फायदा होत नाही. प्रमाणपत्र तातडीने देऊ नका असंही सरकारने सांगितलं आहे. तिनही बाजूंनी त्रास देत आहेत. दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळ केल्याचं लोकांच्या लक्षात आले आहे आणि ही सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस