शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

२० टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव, पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:23 IST

उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्दे२० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतलीपाणी वापर संस्थांसाठी सव्वा टीएमसी पाणी फेब्रुवारीनंतर आरक्षित ठेवले जाईल फेब्रुवारी व मार्चमध्ये भीमा नदीतून पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६  : उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. उजनीच्या पाणी नियोजनाबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता रा. ज. कांबळे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. व्ही. जोशी, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यू. बी. माशाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. खडतरे, एन. एम. गयाळे, बी. के. नागणे आदी उपस्थित होते.सीना नदीवरून मोहोळ नगरपालिकांसह इतर पाणी वापर संस्थांसाठी सव्वा टीएमसी पाणी फेब्रुवारीनंतर आरक्षित ठेवले जाईल, असे चौगुले यांनी सांगितले. बोरी नदीतून ०.३० टीएमसी पाणी दुधनी, मैंदर्गी आणि अक्कलकोट नगरपालिकांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय झाला. हिळ्ळी बंधाºयासाठी फेब्रुवारी व मार्चमध्ये भीमा नदीतून पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल. सोलापूर जिल्हा परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी अद्याप मागणी केलेली नाही. मागणी नोंदवल्यास ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असणारे पाणी आरक्षण केले जाईल, असे चौगुले यांनी सांगितले. यावर ग्रामपंचायतीसाठी आवश्यक पाण्याची मागणी दोन दिवसात जलसंपदा विभागाकडे नोंदवावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या. पिण्यासाठी नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. यासाठी तहसीलदार, जलसंपदा, महावितरण या विभागाच्या अधिकाºयांची समिती नियुक्त करावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्या.------------------------------थकीत पाणीपट्टी वसुली करून द्यावीया बैठकीत चौगुले यांनी थकीत पाणीपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेकडे सर्वाधिक ५२ कोटी थकीत आहेत. साखर कारखाने आणि नगरपालिकांकडेही थकबाकी असल्याचे जलसंपदाच्या अधिकाºयांनी सांगितले. नगरपालिकांकडील थकीत रक्कम जिल्हाधिकाºयांनी वसूल करून द्यावी, अशी मागणी चौगुले यांनी केली. जिल्हाधिकाºयांनी नगरपालिकांच्या अनुदानातून ही रक्कम द्यायला सांगू, असे सांगितले. तर थकीत कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरण