शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

अमावस्येचा अंधारही दूर करतो ‘त्यांच्या’ आयुष्यातील काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:40 IST

मिरची, बिब्बा, कोहळा : खडी फोडणारे हात करतात व्यवसाय

ठळक मुद्देअमावस्या महिन्यातून एकदाच येत असल्याने अर्थार्जनाची ही संधीही महिन्यातून एकदाच मिळते.दुकानदार, व्यापारी, मराठी-कन्नड भाषिक अमावस्येच्या पूजेसाठी या वस्तू खरेदी करतातरस्त्यावर खडी फोडून राठ झालेले हात अमावस्येला मात्र व्यवसायात गुंततात.

गोपालकृष्ण मांडवकर। सोलापूर : अमावस्या म्हणजे अंधार... दुष्ट शक्तींचा संचार असणारा काळ, अशी आपल्याकडे धारणा! म्हणूनच अमावस्येला शुभकार्ये शक्यतो टाळली जातात. मात्र याच अमावस्येचा अंधार काही जणांच्या आयुष्यातील काळोख दूर करून जगण्यासाठी आधार देत असेल तर...! होय, हे खरेच आहे. प्रत्यक्षात ही विसंगती वाटत असली तरी व्यवहारातील शाश्वत मात्र नक्कीच आहे.

सोलापुरातील अनेक चौकांमध्ये अमावस्येच्या आदल्या दिवशी कोहळे, मिरची, बिब्बा, लिंबू विकणारी बायकामुले हमखास दिसतात. नेमक ी अमावस्येच्या आदल्या दिवशीच होणारी ही विक्री या दृष्टीने लक्ष वेधणारी ठरते. आसरा चौकालगत रस्त्याच्या कडेला बसून अवसाबाई काळे या ६५ वर्षांच्या आजीबाई हमखास न चुकता अमावस्येच्या आदल्या दिवशी विकायला येतात, काही अंतरावर त्यांचा मुलगा आणि सूनही असेच रस्त्याच्या कडेला दुकान थाटून बसलेल्या दिसतात.

७ डिसेंबरला अमावस्या असल्याने आदल्या दिवशीही म्हणजे गुरूवार त्यांनी आपले दुकान लावले होते. अवसाबाई अशिक्षित. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झालेले. विजापूर नाका परिसरात ते राहतात. कुटुंबात तीन मुले, सुना आणि नातवंडे. महिनाभर रस्त्यावर खडी फोडण्याचे काम ते करतात. दिवसभराच्या श्रमाने शरीर आंबून जाते. मजुरीही त्या मानाने कमीच मिळते. मात्र अमावस्या आली की, दोन दिवस खडी फोडण्याचे काम ते बंद करतात. आसरा चौकात कोहळे, लिंबू, मिरची, बिब्बा विकतात. यार्डातून ठोक भावाने माल आणतात. होणाºया या चिल्लर विक्रीतून हजार ते पाचशे रुपये हातात येतात. इतरांसाठी अमावस्या काळोखाची असली तरी त्यांच्यासाठी अंधार दूर करणारी ठरते, ती ही अशी!

आसरा चौकात जनाबाई काळे ही महिला अशीच विक्री करत असते. पुढे काही अंतरावर अवसाबाईचा लहान मुलगा विक्रीला बसतो. चार वर्षांपूर्वी तिथे त्याचे वडील विक्रीला बसायचे, ते गेल्यापासून हा मुलगा येथे बसून व्यवसाय करतो. डी-मार्ट चौकामध्ये जनाबाई पवार ही महिलासुद्धा अमावस्येला हा व्यवसाय करते. बाजारातून किलोभर बिब्बे आणून ते तारामध्ये ओवायचे. त्यात लिंबू, मिरची ओवण्यासाठी तिच्या तीन लहान मुली मदत करतात. मिरची-लिंबूची माळ २० रुपयात, बिब्बा पाच रुपयात, कोहळे ५० ते ६० रुपयात आणि शिंके २० रुपयांना असा ठरलेला दर. मात्र उन्हाळ्यात कोहळ्याचे उत्पादन नसते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच हा व्यवसाय करता येतो. अशा वेळी केवळ लिंबू, मिरची बिब्बेच विकावे लागतात. यातून जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागते. 

संधी महिन्यातून एकदाच - अमावस्या महिन्यातून एकदाच येत असल्याने अर्थार्जनाची ही संधीही महिन्यातून एकदाच मिळते. दुकानदार, व्यापारी, मराठी-कन्नड भाषिक अमावस्येच्या पूजेसाठी या वस्तू खरेदी करतात. रस्त्यावर खडी फोडून राठ झालेले हात अमावस्येला मात्र व्यवसायात गुंततात. औटघटकेचा हा व्यवसायही त्यांच्या अंधारलेल्या आयुष्याला उभारी देतो आणि प्रतीक्षा करायला लावतो... पुन्हा महिन्याने येणाºया अमावस्येची!

टॅग्स :Solapurसोलापूर