शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अमावस्येचा अंधारही दूर करतो ‘त्यांच्या’ आयुष्यातील काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:40 IST

मिरची, बिब्बा, कोहळा : खडी फोडणारे हात करतात व्यवसाय

ठळक मुद्देअमावस्या महिन्यातून एकदाच येत असल्याने अर्थार्जनाची ही संधीही महिन्यातून एकदाच मिळते.दुकानदार, व्यापारी, मराठी-कन्नड भाषिक अमावस्येच्या पूजेसाठी या वस्तू खरेदी करतातरस्त्यावर खडी फोडून राठ झालेले हात अमावस्येला मात्र व्यवसायात गुंततात.

गोपालकृष्ण मांडवकर। सोलापूर : अमावस्या म्हणजे अंधार... दुष्ट शक्तींचा संचार असणारा काळ, अशी आपल्याकडे धारणा! म्हणूनच अमावस्येला शुभकार्ये शक्यतो टाळली जातात. मात्र याच अमावस्येचा अंधार काही जणांच्या आयुष्यातील काळोख दूर करून जगण्यासाठी आधार देत असेल तर...! होय, हे खरेच आहे. प्रत्यक्षात ही विसंगती वाटत असली तरी व्यवहारातील शाश्वत मात्र नक्कीच आहे.

सोलापुरातील अनेक चौकांमध्ये अमावस्येच्या आदल्या दिवशी कोहळे, मिरची, बिब्बा, लिंबू विकणारी बायकामुले हमखास दिसतात. नेमक ी अमावस्येच्या आदल्या दिवशीच होणारी ही विक्री या दृष्टीने लक्ष वेधणारी ठरते. आसरा चौकालगत रस्त्याच्या कडेला बसून अवसाबाई काळे या ६५ वर्षांच्या आजीबाई हमखास न चुकता अमावस्येच्या आदल्या दिवशी विकायला येतात, काही अंतरावर त्यांचा मुलगा आणि सूनही असेच रस्त्याच्या कडेला दुकान थाटून बसलेल्या दिसतात.

७ डिसेंबरला अमावस्या असल्याने आदल्या दिवशीही म्हणजे गुरूवार त्यांनी आपले दुकान लावले होते. अवसाबाई अशिक्षित. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झालेले. विजापूर नाका परिसरात ते राहतात. कुटुंबात तीन मुले, सुना आणि नातवंडे. महिनाभर रस्त्यावर खडी फोडण्याचे काम ते करतात. दिवसभराच्या श्रमाने शरीर आंबून जाते. मजुरीही त्या मानाने कमीच मिळते. मात्र अमावस्या आली की, दोन दिवस खडी फोडण्याचे काम ते बंद करतात. आसरा चौकात कोहळे, लिंबू, मिरची, बिब्बा विकतात. यार्डातून ठोक भावाने माल आणतात. होणाºया या चिल्लर विक्रीतून हजार ते पाचशे रुपये हातात येतात. इतरांसाठी अमावस्या काळोखाची असली तरी त्यांच्यासाठी अंधार दूर करणारी ठरते, ती ही अशी!

आसरा चौकात जनाबाई काळे ही महिला अशीच विक्री करत असते. पुढे काही अंतरावर अवसाबाईचा लहान मुलगा विक्रीला बसतो. चार वर्षांपूर्वी तिथे त्याचे वडील विक्रीला बसायचे, ते गेल्यापासून हा मुलगा येथे बसून व्यवसाय करतो. डी-मार्ट चौकामध्ये जनाबाई पवार ही महिलासुद्धा अमावस्येला हा व्यवसाय करते. बाजारातून किलोभर बिब्बे आणून ते तारामध्ये ओवायचे. त्यात लिंबू, मिरची ओवण्यासाठी तिच्या तीन लहान मुली मदत करतात. मिरची-लिंबूची माळ २० रुपयात, बिब्बा पाच रुपयात, कोहळे ५० ते ६० रुपयात आणि शिंके २० रुपयांना असा ठरलेला दर. मात्र उन्हाळ्यात कोहळ्याचे उत्पादन नसते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच हा व्यवसाय करता येतो. अशा वेळी केवळ लिंबू, मिरची बिब्बेच विकावे लागतात. यातून जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागते. 

संधी महिन्यातून एकदाच - अमावस्या महिन्यातून एकदाच येत असल्याने अर्थार्जनाची ही संधीही महिन्यातून एकदाच मिळते. दुकानदार, व्यापारी, मराठी-कन्नड भाषिक अमावस्येच्या पूजेसाठी या वस्तू खरेदी करतात. रस्त्यावर खडी फोडून राठ झालेले हात अमावस्येला मात्र व्यवसायात गुंततात. औटघटकेचा हा व्यवसायही त्यांच्या अंधारलेल्या आयुष्याला उभारी देतो आणि प्रतीक्षा करायला लावतो... पुन्हा महिन्याने येणाºया अमावस्येची!

टॅग्स :Solapurसोलापूर