शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

सोलापूर स्मार्ट सिटीतील दररोजचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:14 IST

हिप्परग्याची पातळी खालावली: उन्हामुळे वाढली पाण्याची मागणी

ठळक मुद्दे स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावितहिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एबीडी एरियात (जुने गावठाण) दररोज पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पांतर्गत गोलचावडी व नवीपेठ भागात आॅगस्टपासून करण्यात येत असलेल्या दररोज पाणीपुरवठ्यावर गंडांतर येणार आहे. हिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

 स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.  त्याप्रमाणे गावठाण हद्दीतील भागात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर दोन भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये दयानंद कॉलेज पाण्याच्या टाकीवरून जुनी गोलचावडी परिसर, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार परिसर, कुंभार वेस, काशीकापडे गल्ली, चाटी गल्ली, गोल व बोरामणी तालीम, वडार गल्ली परिसरातील काही भागांचा समावेश आहे.  

दुसरा भाग उजनी जलवाहिनीवरून निवडण्यात आला आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून कोंडी एमबीआर ते शहरातील पाण्याच्या टाक्यांना जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. कोंडी एमबीआरवरून येणाºया जलवाहिनीला जुना पुणे नाका येथे एक दुसरी जलवाहिनी जोडलेली आहे. या जलवाहिनीवरून शिवशक्ती हॉटेल परिसर, दक्षिण व उत्तर कसबा, नवीपेठ, पत्रा तालीमच्या भागापर्यंत दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे ८ आॅगस्टपासून या भागात दररोज अर्धा तास पाणी देण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरात विजेचा व्यत्यय, औज बंधारा कोरडा, जलवाहिनीत बिघाड यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  या काळात दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या प्रयोगावरही परिणाम झाला. गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे व पाणी वितरणाचे दिवस वाढले आहेत. यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी वितरणाचे नियोजन करणे जड जात आहे. --------------

  • - हिप्परगा तलावाची पातळी खालावली आहे. दुबार पंपिंगद्वारे आता दररोज केवळ १ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी उपलब्ध होत आहे. पाणी गिरणीची क्षमता २२.५ एमएलडी इतकी आहे. त्यामुळे कमी पडणारे पाणी उजनी जलवाहिनीवरून घेण्यात येत आहे. उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलल्यानंतर वाढलेले पाणी या नियोजनात जात आहे. त्यामुळे आता लवकरच दररोजचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार अशी चिन्हे आहेत.

--------------दोन दिवसाआड अशक्य- आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी जलवाहिन्याचे जोड पूर्ण झाल्यावर व अमृतमधील कामे पूर्ण झाल्यावर पाणी वाढणार असे सांगितले होते. यातून डिसेंबरनंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. पण आता निर्माण झालेली परिस्थिती पाहता तीन दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दोन दिवसाआडच्या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीSmart Cityस्मार्ट सिटी