शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील रे नगरच्या घरांमध्ये क्रश सँडचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:57 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देसोलापुरातील पहिला प्रयोगभारतातील अद्ययावत तंत्रज्ञान

मिलिंद राऊळसोलापूर : महाराष्टÑात सध्या वाळूच्या टंचाईमुळे लाखो बांधकामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेनगर फेडरेशनच्या वतीने पंधे कन्स्ट्रक्शनच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

देशात सर्वत्र वाळूटंचाईचा सामना बांधकाम व्यावसायिकांना करावा लागत असताना सोलापुरातील रेनगर फेडरेशनच्या घरांना आंतरराष्टÑीय पातळीवर सर्वांत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ३० हजारे घरे बांधण्यात येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधण्यात येत असलेल्या या घरांना क्रश सँड वापरण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान भारतात केवळ याआधी एल अ‍ॅण्ड टी या कंपनीने वापरलेले आहे.

श्रमिकांना लवकरात लवकर आणि स्वस्तात घरे मिळावीत म्हणून पंधे कन्स्ट्रक्शनने मोठ्या प्रमाणावर येथे काम सुरू केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे किमान १०० वर्षे टिकणार असे घर बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नैसर्गिक संकटाने घराची हानी होऊ नये, असे तंत्रज्ञान या पद्धतीत आहे. 

संकटापासूनसुद्धा या श्रमिकांचे घर वाचावे, अशी काळजी बांधकाम करताना घेण्यात येत आहे. युद्धपातळीवर घर उभारणीचे काम सुरू असून, ठरविल्याप्रमाणे कामगारांना हक्काच्या घराची चावी देण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साकार होणाºया गृहप्रकल्पाला माजी आमदार नरसय्या आडम, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. विजय मराठे, नगरसेविका कामिनी आडम, पंधे कन्स्ट्रक्शनचे अंकुर पंधे, मेहुल मुळे, दाऊद शेख यांनी भेट देऊन या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

क्रश सँड म्हणजे काय?महाराष्टÑात सध्या वाळूची अभूतपूर्व टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर क्रश सँडद्वारे बांधकामाचा प्रयोग उपयुक्त आहे. बांधकामाला वापरली जाणारी खडी मशीनद्वारे घासायची. घासल्यानंतर त्याचे वाळूसारखे कण निर्माण होतात. या कणाचा वापर करून संपूर्ण बांधकाम करायचा, असा हा क्रश सँडचा प्रकार आहे. यामुळे नद्यांमधून बेसुमार उपसा होणाºया वाळूला लगाम बसेल आणि मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धनासाठी मदत होईल.

घरांचे काम सुरू केले आहे. महिनाअखेर केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान मिळेल. यानंतर दोन महिन्यांत २० मशीनचा वापर करून महिन्याला ८०० घरे बांधून पूर्ण करण्यात येणार आहेत. येत्या चार वर्षांत कामगारांना घरे देण्याचा संकल्प सोडला आहे.- नरसय्या आडम, संस्थापक, रे नगर फेडरेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ३० हजार घरांच्या बांधकामाचे काम सुरू आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बांधलेली ही घरे संपूर्ण देशात ‘मॉडेल’ ठरावीत, असा आमचा प्रयत्न आहे.- अंकुर पंधे, विकासक

टॅग्स :SolapurसोलापूरReal Estateबांधकाम उद्योगgovernment schemeसरकारी योजना