शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाचे संकट; १५ गुंठ्यावरील गुलाबाची रोपं बांधावर काढून फेकली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:55 IST

लॉकडाऊनच्या फटका; घाम गाळून रोपांना दिले होते घटका-घटका पाणी...

ठळक मुद्देवांजारवाडीतील शेतकºयाने फुले बांधावर फेकली सद्या फुलाचा हंगाम सुरू असून उत्सव आणि बाजारपेठा बंद आहेतनेमक्या कमाईच्या काळात  फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली

अक्षय आखाडे 

कोर्टी : अडचणींवर मात करुन फुलांची लागवड केली़़क़डक उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिष्य असताना इकडून तिकडून पाणी जमा करुन रोपं जगवली..आता बहर आला, विक्रीचा काळ आला अन कोरोनाचे अरिष्ठ ओढावले..१५ गुंठ्यावरील गुलाबं मातीमोल करुन बांधावर फेकून देण्याची वेळ एका करमाळा तालुक्यातील एका बळीराजावर आली.

नागेश खांडेकर असे त्या शेतकºयाचे नाव़ कोरोनाच्या या फटक्याने त्याचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.  जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने ३ मे पर्यंत  लॉक डाऊन केले़ या काळात शेतकºयांना शेतमाल बाजार पेठेत पोहाचवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. फळे, भाजीपाला उत्पादक शेतकºयांच्या पाठोपाठ आता फूल उत्पादक शेतकºयांना देखील  आपली फुले बाजारपेठेत नेता आली नाहीत.

 वांजारवाडी (ता़ करमाळा) येथील नागेश खांडेकर याची देखील अशीच काहीशी परिस्थिती झालेली आहे. खांडेकर यांनी १५ गुंठे क्षेत्रात पॉली हाऊस करून त्यामध्ये  गुलाब फुलांची लागवड केली. परंतू उत्पादित फुले बाजारपेठेत नेता आली नाहीत. त्यामुळे या शेतकºयाला गुलाबाची फु ले बांधावर फेकून देण्याची वेळ आली़ लॉक डाउनमूळे विक्री न झाल्याने खांडेकर यांना आता पर्यंत तीन लाखाचा फटका बसला आहे. केलेला खर्च वसूल होण्याऐवजी आता कर्ज बाजरी होण्याची वेळ आल्याचे खांडेकर यांनी सांगितले. 

नियोजन फसले

  • - ते आपल्या शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अलीकडे लग्न उत्सव आणि उत्सव, सभारंभात गुलाब फुलांना मोठी मागणी आहे़ शिवाय दरवषी उत्तम भाव मिळतो़ हेच सूत्र लक्षात घेता खांडेकर यांनी प्रथम पॉली हाऊस करून त्यात गुलाब फुलांच्या रोपट्याची लागवड केली. चागलं निरोगी फुले मिळावी म्हणून त्यांनी पाण्याचे नियोजन, औषध फवारणी केली़ योग्य काळजी घेतल्याने उत्तम प्रतीची फुले देखील आली.
  • - जानेवारी ते मे महिन्यात फुलांचा हंगाम सुरू होतो. परंतू नागेश खांडेकर यांना त्यांनी पिकवलेली फुले सरकारने केलेल्या लॉक डाऊन मुळे शहरी बाजारपेठेच्या  ठिकाणी नेता आली नाहीत. अखेर गुलाब फुलांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणावी इतकी मागणी नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्यामुळे फुललेली फुले खराब झाल्याने फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

विविध ठिकाणी मागणी पाहता गुलाब फुलांची लागवड केली़ सद्या फुलाचा हंगाम सुरू असून उत्सव आणि बाजारपेठा बंद आहेत़ फुलला मागणी नाही़ त्यामुळं नेमक्या कमाईच्या काळात  फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.  तीन लाखाचे नुकसान झाले आहे. सरकारने आता शेतकºयांसाठी मदतीचे धोरण आखावे़ - नागेश खांडेकरगुलाब उत्पादक, वांजारवाडी.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस