शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे संकट; १५ गुंठ्यावरील गुलाबाची रोपं बांधावर काढून फेकली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:55 IST

लॉकडाऊनच्या फटका; घाम गाळून रोपांना दिले होते घटका-घटका पाणी...

ठळक मुद्देवांजारवाडीतील शेतकºयाने फुले बांधावर फेकली सद्या फुलाचा हंगाम सुरू असून उत्सव आणि बाजारपेठा बंद आहेतनेमक्या कमाईच्या काळात  फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली

अक्षय आखाडे 

कोर्टी : अडचणींवर मात करुन फुलांची लागवड केली़़क़डक उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिष्य असताना इकडून तिकडून पाणी जमा करुन रोपं जगवली..आता बहर आला, विक्रीचा काळ आला अन कोरोनाचे अरिष्ठ ओढावले..१५ गुंठ्यावरील गुलाबं मातीमोल करुन बांधावर फेकून देण्याची वेळ एका करमाळा तालुक्यातील एका बळीराजावर आली.

नागेश खांडेकर असे त्या शेतकºयाचे नाव़ कोरोनाच्या या फटक्याने त्याचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे.  जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने ३ मे पर्यंत  लॉक डाऊन केले़ या काळात शेतकºयांना शेतमाल बाजार पेठेत पोहाचवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. फळे, भाजीपाला उत्पादक शेतकºयांच्या पाठोपाठ आता फूल उत्पादक शेतकºयांना देखील  आपली फुले बाजारपेठेत नेता आली नाहीत.

 वांजारवाडी (ता़ करमाळा) येथील नागेश खांडेकर याची देखील अशीच काहीशी परिस्थिती झालेली आहे. खांडेकर यांनी १५ गुंठे क्षेत्रात पॉली हाऊस करून त्यामध्ये  गुलाब फुलांची लागवड केली. परंतू उत्पादित फुले बाजारपेठेत नेता आली नाहीत. त्यामुळे या शेतकºयाला गुलाबाची फु ले बांधावर फेकून देण्याची वेळ आली़ लॉक डाउनमूळे विक्री न झाल्याने खांडेकर यांना आता पर्यंत तीन लाखाचा फटका बसला आहे. केलेला खर्च वसूल होण्याऐवजी आता कर्ज बाजरी होण्याची वेळ आल्याचे खांडेकर यांनी सांगितले. 

नियोजन फसले

  • - ते आपल्या शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अलीकडे लग्न उत्सव आणि उत्सव, सभारंभात गुलाब फुलांना मोठी मागणी आहे़ शिवाय दरवषी उत्तम भाव मिळतो़ हेच सूत्र लक्षात घेता खांडेकर यांनी प्रथम पॉली हाऊस करून त्यात गुलाब फुलांच्या रोपट्याची लागवड केली. चागलं निरोगी फुले मिळावी म्हणून त्यांनी पाण्याचे नियोजन, औषध फवारणी केली़ योग्य काळजी घेतल्याने उत्तम प्रतीची फुले देखील आली.
  • - जानेवारी ते मे महिन्यात फुलांचा हंगाम सुरू होतो. परंतू नागेश खांडेकर यांना त्यांनी पिकवलेली फुले सरकारने केलेल्या लॉक डाऊन मुळे शहरी बाजारपेठेच्या  ठिकाणी नेता आली नाहीत. अखेर गुलाब फुलांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणावी इतकी मागणी नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्यामुळे फुललेली फुले खराब झाल्याने फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

विविध ठिकाणी मागणी पाहता गुलाब फुलांची लागवड केली़ सद्या फुलाचा हंगाम सुरू असून उत्सव आणि बाजारपेठा बंद आहेत़ फुलला मागणी नाही़ त्यामुळं नेमक्या कमाईच्या काळात  फुले बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.  तीन लाखाचे नुकसान झाले आहे. सरकारने आता शेतकºयांसाठी मदतीचे धोरण आखावे़ - नागेश खांडेकरगुलाब उत्पादक, वांजारवाडी.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस