शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सोलापूरच्या खादी ग्रामोद्योगकडून १० कोटींवर पतपुरवठा, साडेचार हजारांना व्यवसाय, पंतप्रधान रोजगार योजनेच्या उद्दिष्टात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:02 PM

महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाला २०१६-१७ पर्यंत ४२६ लाभार्थ्यांचे उद्दिष्टसहा कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे.देशात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुरुवात २००८-०९ पासून झाली. या योजनेसाठी सोलापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाला २०१६-१७ पर्यंत ४२६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात सहा कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. या कार्यालयाने उद्दिष्टापुढे जात ६७५ लाभार्थ्यांना या काळात नऊ कोटी ४८ लाख ९७ हजार रुपयांचा पतपुरवठा बँकांमार्फत केला. विशेष घटक योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध या घटकांकरिता २०११ ते २०१६-१७ या काळासाठी दोन हजार ३१८ लाभार्थ्यांच्या रोजगारपूर्तीसाठी दोन कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचे भौतिक उद्दिष्ट देण्यात आले होते. या काळात एक हजार २०३ लाभार्थ्यांना एक कोटी २० लाख सात हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात या कार्यालयाला यश आले. विशेष घटक योजनेत उद्दिष्टपूर्ती नसली तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर कार्यालयाचे काम चांगले असल्याची आकडेवारी आहे. लाभार्थी अनुसूूचित जाती आणि नवबौद्ध समाज घटकातील दारिद्र्य रेषेखालील प्रवर्गातून निवडायचे असल्याने जातीचा दाखला, रहिवासी दाखला ही कागदपत्रे मिळविताना लाभार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे ही स्थिती सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात आहे.मधुमक्षिका पालन उद्योगातूनही या कार्यालयाने २०१५-१६ ते १७-१८ या काळात ४६५ शेतकºयांना प्रशिक्षण दिले असून आत्मा योजनेच्या अंतर्गत हे काम सुरू आहे. आत्मा योजनेतून लाभार्थ्याला ४० ते ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१७ पासून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी २५ लाख तर सेवा उद्योगासाठी १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यात महिला, अपंग, मागास जाती प्रवर्ग, माजी सैनिकांना ३५ टक्के तर इतरांना २५ टक्के सबसिडी मिळते. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी कमिशन आयोग या तीन एजन्सीमार्फत ही योजना राज्यात राबविली जाते. --------------------------मंडळाचे कार्यराज्यातील खादी व ग्रामोद्योगाच्या विकास कार्यासाठी १९६२ मध्ये महाराष्टÑ खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. ग्रामीण क्षेत्रातील गरजूंना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर आणि बलुतेदारांना स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक वृद्धी, उद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांच्या तांत्रिक कौशल्य वाढीसाठी उत्तेजन, मालाच्या विक्रीसाठी मदत आणि प्रशिक्षण आदी उद्दिष्टांसाठी हे मंडळ कार्य करते. --------------------------जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत चालविण्यात येणाºया या कार्यालयाच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि विशेष घटक योजनांतून पारंपरिक आणि लघुउद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. मधमाशा पालन उद्योगातूनही शेतकरी आणि ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्नही करतो. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी लाभार्थी आॅनलाईन अर्ज करू शकतात. - डी. एस. भोसलेजिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, सोलापूर. 

टॅग्स :Khadiखादीjobनोकरी