शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:12 IST

वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पुढाकार : आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीतविजय शुगरकडे जिल्हा बँकेची १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये थकबाकी

सोलापूर: विजय शुगरचा ताबा घेतल्यानंतर आता आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी बँकेची सध्या न्यायालयीन व प्रशासकीय लढाई सुरू आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे बँकेच्या शेतकºयांकडील वसुलीसाठी हातभार लागला आहे; मात्र मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली होत नसल्याने बँकेने मालमत्ता ताब्यात घेणे व त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरकडे जिल्हा बँकेची सुमारे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये इतकी थकबाकी आहे. ही रक्कम वसूल होत नसल्याने बँकेने रितसर विजय शुगरच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. आता बँक या कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगरचा ताबा मिळावा यासाठी बँकेने उच्च न्यायालयात अपील केले आहे. आर्यन शुगरकडे जिल्हा बँकेचे २१९ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठीची प्रक्रिया कारखान्याची मालमत्ता विक्री करुनच पूर्ण होणार आहे.आदित्यराज शुगरवर ४५ कोटींचा बोजामाजी संचालक अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगरकडे २५ कोटी ८९ लाख ७२ हजार रुपये मुद्दल व १९ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये व्याज असे ४५ कोटी १८ लाख १५ हजार रुपये थकबाकी आहे,  कर्जापोटीच जुळे सोलापुरातील गट नंबर ९/१ब, प्लॉट नंबर १२ क्षेत्र ३०४ चौरस मीटरचा ताबा घेतला आहे. चार कारखान्यांकडे ५६६ कोटी थकले !

  • - आर्यन शुगरकडे मुद्दल १३१ कोटी ५ लाख ९ हजार व व्याज ८८ कोटी ३६ हजार २०६ रुपये अशी २१९ कोटी ४१ लाख २९ हजार थकबाकी आहे.
  • - विजय शुगरकडे ११३ कोटी ६० लाख ७५ हजार तर व्याज ६५ कोटी ५४ लाख रुपये असे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये येणेबाकी आहे. 
  • - अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे ५८ कोटी ४६ लाख ७४ हजार रुपये मुद्दल व २९ कोटी २९ लाख ३० हजार रुपये व्याज अशी ८७ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
  • - सांगोला साखर कारखान्याकडे ३७ कोटी १२ लाख ९३ हजार रुपये मुद्दल व ४२ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये व्याज अशी एकूण ८० कोटी ९ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. 
  • - विजय, आर्यन, स्वामी समर्थ व सांगोला या चार कारखान्यांकडे ५६६ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपये थकले आहेत. 

शेतकºयांना पीक असेल त्याप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँकेला पैशाची गरज आहे. मोठ्या सर्वच थकबाकीदारांकडील वसुलीसाठी बँकेचा प्रयत्न आहे. वसुली आल्यानंतर शेतकºयांनाच प्राधान्याने कर्ज दिले जाणार आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक