शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या थकबाकीसाठी सोलापूर जिल्हा बँकेची न्यायालयीन लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:12 IST

वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पुढाकार : आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीतविजय शुगरकडे जिल्हा बँकेची १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये थकबाकी

सोलापूर: विजय शुगरचा ताबा घेतल्यानंतर आता आर्यन शुगरचा ताबा मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी बँकेची सध्या न्यायालयीन व प्रशासकीय लढाई सुरू आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने बँक सध्या अडचणीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे बँकेच्या शेतकºयांकडील वसुलीसाठी हातभार लागला आहे; मात्र मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली होत नसल्याने बँकेने मालमत्ता ताब्यात घेणे व त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरकडे जिल्हा बँकेची सुमारे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये इतकी थकबाकी आहे. ही रक्कम वसूल होत नसल्याने बँकेने रितसर विजय शुगरच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. आता बँक या कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगरचा ताबा मिळावा यासाठी बँकेने उच्च न्यायालयात अपील केले आहे. आर्यन शुगरकडे जिल्हा बँकेचे २१९ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठीची प्रक्रिया कारखान्याची मालमत्ता विक्री करुनच पूर्ण होणार आहे.आदित्यराज शुगरवर ४५ कोटींचा बोजामाजी संचालक अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगरकडे २५ कोटी ८९ लाख ७२ हजार रुपये मुद्दल व १९ कोटी २८ लाख ४३ हजार रुपये व्याज असे ४५ कोटी १८ लाख १५ हजार रुपये थकबाकी आहे,  कर्जापोटीच जुळे सोलापुरातील गट नंबर ९/१ब, प्लॉट नंबर १२ क्षेत्र ३०४ चौरस मीटरचा ताबा घेतला आहे. चार कारखान्यांकडे ५६६ कोटी थकले !

  • - आर्यन शुगरकडे मुद्दल १३१ कोटी ५ लाख ९ हजार व व्याज ८८ कोटी ३६ हजार २०६ रुपये अशी २१९ कोटी ४१ लाख २९ हजार थकबाकी आहे.
  • - विजय शुगरकडे ११३ कोटी ६० लाख ७५ हजार तर व्याज ६५ कोटी ५४ लाख रुपये असे १७९ कोटी १४ लाख ७० हजार रुपये येणेबाकी आहे. 
  • - अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याकडे ५८ कोटी ४६ लाख ७४ हजार रुपये मुद्दल व २९ कोटी २९ लाख ३० हजार रुपये व्याज अशी ८७ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
  • - सांगोला साखर कारखान्याकडे ३७ कोटी १२ लाख ९३ हजार रुपये मुद्दल व ४२ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये व्याज अशी एकूण ८० कोटी ९ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. 
  • - विजय, आर्यन, स्वामी समर्थ व सांगोला या चार कारखान्यांकडे ५६६ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपये थकले आहेत. 

शेतकºयांना पीक असेल त्याप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँकेला पैशाची गरज आहे. मोठ्या सर्वच थकबाकीदारांकडील वसुलीसाठी बँकेचा प्रयत्न आहे. वसुली आल्यानंतर शेतकºयांनाच प्राधान्याने कर्ज दिले जाणार आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक