शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची फसवणूक करणाºया अडत्यांवर दंडात्मक कारवाई करणार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा इशारा,  शेतमाल तारण कर्जाच्या धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:19 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपणनमंत्र्यांच्या धोरणामुळे शेतकºयांना योजनांचा लाभराज्य सरकारच्या पारदर्शी कारभारामुळे बाजार समित्या, सहकारी सोसायट्या सक्षमपणे काम करीत आहेराज्य सरकार शेतकºयांच्या हिताची जपणूक करणारे धोरण राबवत आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : राज्य सरकार शेतकºयांच्या हिताची जपणूक करणारे धोरण राबवत आहे. आॅनलाईन लिलावामुळे पारदर्शी खरेदी-विक्री शक्य आहे. शेतमालाच्या लिलावात शेतकºयांची फसवणूक करणाºया अडत व्यापाºयांवर दंडात्मक कारवाईचा कायदा लवकरच अस्तित्वात येईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना दिली.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख होते. महापौर शोभाताई बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेताना वर्षभरात मालाची आवक आणि आर्थिक उलाढाल वाढल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना पणनमंत्री देशमुख म्हणाले, शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकºयांची पिळवणूक थांबविण्यासाठी ही योजना अस्तित्वात आली, परंतु तिचा अंमल प्रभावी नव्हता. ई-नाम वेबपोर्टल सुरू होत असून, शेतमालाचे लिलाव आॅनलाईन करण्यात येतील. आजही वेगळ्या मार्गाने व्यापारी अडत कपात करतात. तिचे समूळ उच्चाटन केले पाहिजे.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्य सरकारच्या पारदर्शी कारभारामुळे बाजार समित्या, सहकारी सोसायट्या सक्षमपणे काम करीत असल्याचे सांगितले. प्रशासकामुळे सोलापूर बाजार समितीची उलाढाल दुपटीने वाढली याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पणनमंत्र्यांच्या धोरणामुळे शेतकºयांना योजनांचा लाभ होत असल्याचे सांगितले. महापौर शोभाताई बनशेट्टी यांचेही भाषण झाले. शेतकरी श्रीमंत बंडगर यांनी बाजार समितीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. शेतकºयांच्या मुलांना बाजार समितीकडून लॅपटॉप पुरवावेत, वसतिगृह सुरू करावे आणि स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी केली.यावेळी दक्षिण सोलापूर सभापती ताराबाई पाटील, उपसभापती संदीप टेळे, उत्तरच्या उपसभापती रजनी भडकुंबे, पं.स. सदस्य एम.डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, नवगिरे, जि.प. सदस्य अण्णाराव बाराचारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन कल्याणशेट्टी, काशिनाथ कदम, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. अशोक कारडी, प्रभारी सचिव विनोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. सी.जी. हविनाळे, शिवलिंग कोडले, सुनील कळके, केदार विभुते, श्रीमंत बंडगर, संभाजी भडकुंबे, सतीश लामकाने, आप्पा गुंड, सिद्धाराम म्हेत्रे, डोणगावचे सरपंच संजय भोसले, दोड्डीचे सरपंच मल्लिनाथ गिराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख