शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST

टेंभुर्णी : दहा दिवसांत शेख कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला. हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील कर्ती माणसे गेल्याने ...

टेंभुर्णी : दहा दिवसांत शेख कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला. हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील कर्ती माणसे गेल्याने दीड वर्षाची मुलगी, नवजात मुलगा अनाथ झाला आहे. आता घरात या साऱ्यांचा पालनकर्ता म्हणून भय्या शेख हा धडपडत आहे.

मृत व्यक्तींचा स्कोअर उपचारादरम्यान फक्त एक होता. घरातील पाच लोकांना जीव गमवावा लागला आहे, हे आरोग्ययंत्रणा व प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोप पाणावलेल्या डोळ्यांनी भय्या शेख याने केला.

एप्रिल व मे या दोन महिन्यांत टेंभुर्णी शहर व परिसरातील अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. शेख कुटुंबीयांचे दुःख शब्दांत वर्णन करण्यासारखे नाही. २७ एप्रिल ते ६ मे या १० दिवसांत या एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे.

एप्रिल महिन्यातील २० तारखेला शेख कुटुंबाचे प्रमुख हनिफ मौला शेख हे कोरोनाबाधित झाले. २१ तारखेला घरातील सर्वच सदस्यांची टेस्ट केली असता दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. लगेच उपचार सुरू केले. २६ एप्रिलला हनिफ शेख (वय ६८) यांना बार्शी येथे ॲडमिट केले. त्यांना ऑक्सिजन लावण्याची गरज नव्हती. परंतु, २७ एप्रिल रोजी त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले. ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. तासाभरातच त्यांचा मृत्यू झाला.

या काळात शेख कुटुंबातील भय्या हनिफ शेख हा तरुण पॉझिटिव्ह असतानाही एकाकी लढत जबाबदाऱ्या पार पाडत होता. तोही मृत्यूच्या दाढेतून परतला. वडील, आई, भाऊ व पत्नी यांचे मृत्यू डोळ्यांदेखत पाहून त्याच्यावर आभाळच कोसळले.

भय्या शेख यातून अद्याप सावरलेला नाही. पत्नीच्या मृत्यूमुळे दीड वर्षाची मुलगी आईविना अनाथ झाली. भावाच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी जन्मलेला त्याचा मुलगा व पत्नी यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.

या साऱ्यांची जबाबदारी भय्या शेख याच्यावर आली आहे. वडील, आई, सावत्र आई, भाऊ व पत्नी ही घरातील सर्व कर्ती माणसे गेल्याने भय्या शेख मानसिकदृष्ट्या खचला आहे.

----

अर्ध्या तासाच्या फरकाने माय-लेकरं गमावली

१ मे रोजी पत्नी ईल्लला हनिफ शेख (६१) यांचा मृत्यू झाला, तर ५ मे रोजी रुक्साना हनिफ शेख (५५) व इक्बाल हनिफ शेख (३१) या मायलेकरांचा अर्ध्या तासाच्या फरकाने इंदापूर येथे मृत्यू झाला. ६ मे रोजी अर्जिया भय्या शेख (वय २४) यांचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहा दिवसांतच शेख कुटुंबातील पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आणि हे कुटुंब उघड्यावर आले.

---