शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:21 IST

चैत्र शुद्ध दशमीची बैठक रद्द : आगामी काळातील परिस्थिती पाहूनच बैठकीचा निर्णय

ठळक मुद्देआषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख ९ पालख्या आहेतसध्या एका ठिकाणी जमाव करण्यास बंदी असल्याने पालखी सोहळा रद्दयंदाचा आषाढी सोहळा खंडित होण्याची भीती वारकरी व महाराज मंडळींमध्ये

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या प्रवास करुन पंढरपुराकडे येत असतात. यामुळे प्रशासनाला अडीच महिन्यांपासून नियोजन करावे लागते. परंतु सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.  आषाढी सोहळ्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे चैत्री यात्रेप्रमाणे आषाढी यात्रा बैठकीवरही कोरोना रोगाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

आषाढी पायी यात्रेच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात चैत्र शुध्द दशमीला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात येते. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, शितोळे सरकार, आरफळकर मालक, ह. भ. प. वासकर महाराज, चोपदार, सर्व फड व दिंडीप्रमुख उपस्थित असतात. परंतु यावर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे चैत्र शुध्द दशमीला होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील परिस्थिती पाहून आषाढी नियोजनाची बैठक घेण्यात येणार असल्याचे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज संघटनेचे सदस्य ह.भ.प. देविदास महाराज ढवळीकर यांनी सांगितले.

यंदा कोरोना या साथीच्या रोगाचे संकट असून, त्यातच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे़ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन केले आहे. सध्या तरी लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत आहे. परंतु या रोगाचा प्रसार कमी झाला नाही तर आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनासह पालखी, दिंडीप्रमुखांना आषाढीची तयारी करायला जमणार नाही. यामुळे यंदाचा आषाढी सोहळा खंडित होण्याची भीती वारकरी व महाराज मंडळींमध्ये आहे.

प्रमुख ९ पालख्यांसह असतात लाखो भाविक- आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख ९ पालख्या आहेत. यामध्ये श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत मुक्ताबाई, श्रीसंत सोपान महाराज, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत नामदेव महाराज, श्रीसंत गजानन महाराज, श्रीसंत निळोबाराय महाराज आदी पालख्या प्रमुख आहेत. या पालख्यांबरोबर लाखो वारकरी असतात. परंतु सध्या एका ठिकाणी जमाव करण्यास बंदी असल्याने पालखी सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस