शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोराेनाने जगणे मुश्कील केले, अपघाताने एकुलत्या एक असलेल्या मुलाला नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 16:17 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : कोरोनाने अनेकांना विधवा केले, तर अनेकांना अनाथ बनवले. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असताना आता रस्ते अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सोलापूर शहरात सहा महिन्यातच २१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात एका कुटुंबीयांना आपला एकुलता एक मुलगाही गमवावा लागला. तसेच दुसऱ्या अपघातात तीन मुलांनी आपला पिता गमावला.

लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक जवळपास बंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर गेले होते. पण जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि गर्दी वाढू लागली, त्यातच सोलापुरात विविध ठिकाणी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनानंतर आता रस्ते अपघातात यमराज नागरिकांच्या समोर उभे आहेत.

मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच २१ प्राणांतिक अपघात झालेले आहेत. मागीलवर्षी ही संख्या ३५ होती. तसेच यंदा सतरा गंभीर अपघातात २४ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्ती या घरातच राहत असून त्यांची कामे करण्यासाठी घरातील तरुण व्यक्ती बाहेर पडत आहेत. त्यातच व्यवसायासाठी असलेल्या निर्बंधांमुळे होणाऱ्या घाईगडबडीत अपघात होत आहेत. यात तरुणांची संख्या जास्त आहे.

दुचाकी स्लिप होण्याचे वाढले प्रकार

शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. यामुळे शहरात दुचाकी स्लिप होण्याचा धोका वाढला आहे. अनेक चौकात वळणावर माती जास्त असल्यामुळे तेथेही दुचाकी स्लिप होण्याचे प्रकार वाढले आहेत.

या ठिकाणी वाहने हळू चालवा...

  • * विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे ब्लॅक स्पॉट मानला जातो. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. यामुळे या मार्गावर असताना वाहने हळू चालवावीत.
  • * मद्दी वस्ती पुलाजवळील स्पीड ब्रेकरजवळ अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. येथे मागील आठवड्यात एका कालच्या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले होते.
  • * मार्केट यार्डसमोरील चौकात जलवाहतुकीच्या वर्दळीमुळे नेहमी अपघात होत असतात. या ठिकाणी वाहने हळू चालवावीत.
  • * शेळगी पुलावर रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्यामुळे दुचाकी घसरून गुळवंची येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, असा आरोप करत त्या गावकऱ्यांनी आंदोलन केले होते.
  •  

लॉकडाऊनमध्ये अपघातांची संख्या झाली कमी

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस बांधव आणि प्रशासनातील कर्मचारी वगळता इतर कोणताही नागरिक घराबाहेर पडू शकत नसल्यामुळे त्या काळातील अपघातांची संख्या शून्यावर आली होती. सोबतच या काळात वाहनांची रहदारी रस्त्यावर कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या