शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कोराेनाने जगणे मुश्कील केले, अपघाताने एकुलत्या एक असलेल्या मुलाला नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 16:17 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : कोरोनाने अनेकांना विधवा केले, तर अनेकांना अनाथ बनवले. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असताना आता रस्ते अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सोलापूर शहरात सहा महिन्यातच २१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात एका कुटुंबीयांना आपला एकुलता एक मुलगाही गमवावा लागला. तसेच दुसऱ्या अपघातात तीन मुलांनी आपला पिता गमावला.

लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक जवळपास बंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर गेले होते. पण जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि गर्दी वाढू लागली, त्यातच सोलापुरात विविध ठिकाणी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनानंतर आता रस्ते अपघातात यमराज नागरिकांच्या समोर उभे आहेत.

मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच २१ प्राणांतिक अपघात झालेले आहेत. मागीलवर्षी ही संख्या ३५ होती. तसेच यंदा सतरा गंभीर अपघातात २४ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्ती या घरातच राहत असून त्यांची कामे करण्यासाठी घरातील तरुण व्यक्ती बाहेर पडत आहेत. त्यातच व्यवसायासाठी असलेल्या निर्बंधांमुळे होणाऱ्या घाईगडबडीत अपघात होत आहेत. यात तरुणांची संख्या जास्त आहे.

दुचाकी स्लिप होण्याचे वाढले प्रकार

शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. यामुळे शहरात दुचाकी स्लिप होण्याचा धोका वाढला आहे. अनेक चौकात वळणावर माती जास्त असल्यामुळे तेथेही दुचाकी स्लिप होण्याचे प्रकार वाढले आहेत.

या ठिकाणी वाहने हळू चालवा...

  • * विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे ब्लॅक स्पॉट मानला जातो. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. यामुळे या मार्गावर असताना वाहने हळू चालवावीत.
  • * मद्दी वस्ती पुलाजवळील स्पीड ब्रेकरजवळ अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. येथे मागील आठवड्यात एका कालच्या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले होते.
  • * मार्केट यार्डसमोरील चौकात जलवाहतुकीच्या वर्दळीमुळे नेहमी अपघात होत असतात. या ठिकाणी वाहने हळू चालवावीत.
  • * शेळगी पुलावर रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्यामुळे दुचाकी घसरून गुळवंची येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, असा आरोप करत त्या गावकऱ्यांनी आंदोलन केले होते.
  •  

लॉकडाऊनमध्ये अपघातांची संख्या झाली कमी

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस बांधव आणि प्रशासनातील कर्मचारी वगळता इतर कोणताही नागरिक घराबाहेर पडू शकत नसल्यामुळे त्या काळातील अपघातांची संख्या शून्यावर आली होती. सोबतच या काळात वाहनांची रहदारी रस्त्यावर कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्या