शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वारकºयांसाठी एसटी सुरु ठेवा; सोलापूरातील ‘सकल मराठा’चा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 15:57 IST

सौहार्द वातावरणाचा प्रयत्न,  सोलापूरच्या आगारप्रमुखांची भेट घेतली

ठळक मुद्देवारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंतीराज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्याच्या विविध भागातील वातावरण मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण होते. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराने बसची वाहतूक बंद ठेवली. यामुळे पंढरपुरात थांबलेल्या वारकºयांचे हाल होण्याची चिन्हे दिसून लागली. परंतु, सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आगारप्रमुख विवेक हिप्पळगावकर यांची भेट घेऊन वारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंती केली. यानंतर एसटी बसची वाहतूक सुरु झाली.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरुन सोमवारी मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यामुळे मराठा संघटनांनी मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी आलेले वारकरी अद्यापही तिथेच थांबून आहेत. ते जोपर्यंत घरी जात नाहीत तोपर्यंत सोलापूर जिल्हा बंदमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय पंढरपूर, सोलापूर येथील सकल मराठा समाजाने जाहीर केला होता. 

राज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट समजल्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, रवी मोहिते, सुहास कदम, भाऊ रोडगे, गणेश डोंगरे, दत्ता भोसले, सोमनाथ चव्हाण यांनी सोलापूर आगार प्रमुखांची भेट घेतली. बार्शी, करमाळ्यासह विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क केला. आम्हाला वारकºयांची काळजी आहे. त्यांना त्रास होईल असा प्रकार आमच्याकडून होणार नाही. त्यामुळे तुम्ही बसची वाहतूक सुरु करा, अशी विनंती केली. यादरम्यान, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे विलास घुमरे आदींनी दूरध्वनीवरुन वातवरण निवळ्याची हमी दिली. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरु झाली.

सलोख्यासाठी प्रयत्न सुरु- मराठा क्रांती मोर्चे सुरु झाल्यानंतर राज्यातील काही भागात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाजातील विविध संघटनांना एकत्र करुन सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. 

प्रक्षोभक वक्तव्ये करणाºयांना समज दिली. दलित, ओबसी, मुस्लिम संघटनांच्या मदतीने सलोख्यासाठी उपक्रम राबविले. हीच परंपरा गेल्या आठ दिवसांपासून जपली जात आहे. सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संंभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा समिती, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क करुन शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आग्रह करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा