शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

वारकºयांसाठी एसटी सुरु ठेवा; सोलापूरातील ‘सकल मराठा’चा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 15:57 IST

सौहार्द वातावरणाचा प्रयत्न,  सोलापूरच्या आगारप्रमुखांची भेट घेतली

ठळक मुद्देवारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंतीराज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्याच्या विविध भागातील वातावरण मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण होते. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराने बसची वाहतूक बंद ठेवली. यामुळे पंढरपुरात थांबलेल्या वारकºयांचे हाल होण्याची चिन्हे दिसून लागली. परंतु, सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आगारप्रमुख विवेक हिप्पळगावकर यांची भेट घेऊन वारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंती केली. यानंतर एसटी बसची वाहतूक सुरु झाली.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरुन सोमवारी मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यामुळे मराठा संघटनांनी मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी आलेले वारकरी अद्यापही तिथेच थांबून आहेत. ते जोपर्यंत घरी जात नाहीत तोपर्यंत सोलापूर जिल्हा बंदमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय पंढरपूर, सोलापूर येथील सकल मराठा समाजाने जाहीर केला होता. 

राज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट समजल्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, रवी मोहिते, सुहास कदम, भाऊ रोडगे, गणेश डोंगरे, दत्ता भोसले, सोमनाथ चव्हाण यांनी सोलापूर आगार प्रमुखांची भेट घेतली. बार्शी, करमाळ्यासह विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क केला. आम्हाला वारकºयांची काळजी आहे. त्यांना त्रास होईल असा प्रकार आमच्याकडून होणार नाही. त्यामुळे तुम्ही बसची वाहतूक सुरु करा, अशी विनंती केली. यादरम्यान, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे विलास घुमरे आदींनी दूरध्वनीवरुन वातवरण निवळ्याची हमी दिली. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरु झाली.

सलोख्यासाठी प्रयत्न सुरु- मराठा क्रांती मोर्चे सुरु झाल्यानंतर राज्यातील काही भागात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाजातील विविध संघटनांना एकत्र करुन सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. 

प्रक्षोभक वक्तव्ये करणाºयांना समज दिली. दलित, ओबसी, मुस्लिम संघटनांच्या मदतीने सलोख्यासाठी उपक्रम राबविले. हीच परंपरा गेल्या आठ दिवसांपासून जपली जात आहे. सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संंभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा समिती, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क करुन शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आग्रह करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा